एक्स्प्लोर

T20 WC Ind vs Pak: विश्वचषकात भारत पाकवर वरचढच, 'या' रोमांचक लढती आजही चाहत्यांच्या स्मरणात

विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. कर्णधार विराट कोहली हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. 

T20 World Cup 2021, IND vs PAK :आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होत आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 11 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

T20 World Cup, India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला....

विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते. दरम्यान, विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही. विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. हा विक्रम कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. 

पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा

एकदिवसीय विश्वचषक 1992 ग्रुप स्टेज मॅच, सिडनी

भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा 1992 मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारतीय संघाने सात विकेट्स गमावून 216 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघाने भारताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 173 धावांवर ऑलआऊट करून 43 धावांनी विजय मिळवला होता. मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वात हा सामना खेळण्यात आला होता. 

टी-20 विश्वचषक 2007  ग्रुप स्टेज मॅच, डरबन

पहिल्या टी-20 विश्वचषकात ग्रुपस्टेजमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली. ज्यात भारतीय संघाने 3-0 बॉल आऊट करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारताकडून रॉबिन उथप्पा (50), महेंद्रसिंह धोनी (33) आणि इरफान पठाण (20) यांच्या खेळीच्या जोरावर संघाने सन्मानजनक स्कोर केला होता. 

एकदिवसीय विश्वचषक 1996 क्वार्टर फायनल मॅच, बंगळरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1996मध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यात आला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात नवज्योत सिद्धूने सर्वाधिक 93 धावा केल्या. तर, अजय जाडेजाने 45 धावा केल्या. भारताने 8 गडी गमावून 287 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमदने 56 धावांत 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 248 धावा करू शकला. 

टी-20 विश्वचषक 2007 फायनल- 

पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडला होता. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या सामन्यात केवळ 5 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ 152 वर ऑलआऊट झाला. या सामन्यात मिस्बाह-उल-हकने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या षटकात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर त्याने श्रीशांतला झेल दिला. 

टी-20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. भारताकडून पुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल? अशी अपेक्षा केली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
Vinesh Phogat News : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये विनेश फोगाटचा एकतर्फी विजय; पण वजन करताना पुन्हा ड्रामा, नेमकं काय घडलं?
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये विनेश फोगाटचा एकतर्फी विजय; पण वजन करताना पुन्हा ड्रामा, नेमकं काय घडलं?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget