एक्स्प्लोर

T20 WC Ind vs Pak: विश्वचषकात भारत पाकवर वरचढच, 'या' रोमांचक लढती आजही चाहत्यांच्या स्मरणात

विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. कर्णधार विराट कोहली हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. 

T20 World Cup 2021, IND vs PAK :आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होत आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 11 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

T20 World Cup, India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला....

विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते. दरम्यान, विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही. विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. हा विक्रम कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. 

पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा

एकदिवसीय विश्वचषक 1992 ग्रुप स्टेज मॅच, सिडनी

भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा 1992 मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारतीय संघाने सात विकेट्स गमावून 216 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघाने भारताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 173 धावांवर ऑलआऊट करून 43 धावांनी विजय मिळवला होता. मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वात हा सामना खेळण्यात आला होता. 

टी-20 विश्वचषक 2007  ग्रुप स्टेज मॅच, डरबन

पहिल्या टी-20 विश्वचषकात ग्रुपस्टेजमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली. ज्यात भारतीय संघाने 3-0 बॉल आऊट करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारताकडून रॉबिन उथप्पा (50), महेंद्रसिंह धोनी (33) आणि इरफान पठाण (20) यांच्या खेळीच्या जोरावर संघाने सन्मानजनक स्कोर केला होता. 

एकदिवसीय विश्वचषक 1996 क्वार्टर फायनल मॅच, बंगळरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1996मध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यात आला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात नवज्योत सिद्धूने सर्वाधिक 93 धावा केल्या. तर, अजय जाडेजाने 45 धावा केल्या. भारताने 8 गडी गमावून 287 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमदने 56 धावांत 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 248 धावा करू शकला. 

टी-20 विश्वचषक 2007 फायनल- 

पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडला होता. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या सामन्यात केवळ 5 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ 152 वर ऑलआऊट झाला. या सामन्यात मिस्बाह-उल-हकने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या षटकात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर त्याने श्रीशांतला झेल दिला. 

टी-20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. भारताकडून पुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल? अशी अपेक्षा केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget