एक्स्प्लोर

PR Sreejesh : भारतीय हॉकीमधील महान पर्व संपणार, गोलकीपर पीआर श्रीजेशची निवृत्तीची घोषणा, अखेरचं ऑलिम्पिक खेळणार

PR Sreejesh : टीम इंडियाच्या हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेशनं मोठी घोषणा केली आहे. पीआर श्रीजेशनं निवृत्ती जाहीर केल्यानं भारताच्या हॉकीच्या इतिहासातील एक पर्व संपणार आहे.

पॅरिस : येत्या काही दिवसांमध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये (Hockey) दीर्घकाळ कामगिरी बजावल्यानंतर गोलकीपर पीआर श्रीजेश (PR Sreejesh) यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक ही माझी शेवटची स्पर्धा असेल, असं पीआर श्रीजेश यांनी म्हटलं. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील किझक्कम्बलम गावातील शेतकरी कुटुंबातील पीआर श्रीजेश यांचा प्रवास हॉकीच्या टीमचा गोलकीपर इथपर्यंत पोहचला. भारताच्या हॉकी टीममध्ये पीआर श्रीजेश यांनी महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं. भारताच्या हॉकी टीमचा कर्णधार म्हणून देखील पीआर श्रीजेश यांनी कामगिरी पार पाडली आहे. गेल्या दहांवर्षांपेक्षा अधिक काळ पीआर श्रीजेश भारताच्या हॉकी संघाचा आधारस्तंभ राहिले आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी भारताच्या हॉकी टीममध्ये पदार्पण केलं होतं.

पीआर श्रीजेश यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. श्रीजेश यांचा हॉकीमध्ये करिअर करण्यापूर्वी अॅथलेटिक्सकडे ओढा होता. त्यांनी  स्प्रिंट, लांब ऊडी आणि व्हॉलीबॉलमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, प्रशिक्षक जयकुमार आणि रमेश कोलप्पा यांच्या मार्गदर्शनात पीआर श्रीजे हॉकीकडे वळले. 


पीआर श्रीजेश यांनी सोशल मीडियावर पोस्टकरुन प्रस्तावित निवृत्तीबाबत घोषणा केली. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीच्या अंतिम टप्प्यावर उभा आहे, असं पीआर श्रीजेश यांनी म्हटलं.  हॉकीमधील या प्रवासात  ज्यांनी पाठिंबा दिला त्यामध्ये कुटुंबीय, संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांसह चाहत्यांच्या ऋणात राहणार असल्याचं श्रीजेश यांनी म्हटलं. 

41 वर्षानंतर भारताला हॉकीमध्ये पदक

पॅरिस ऑलिम्पिक हे पीआर श्रीजेश यांचं अखेरचं ऑलिम्पिक ठरणार आहे. या ऑलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचा निर्णय पीआर श्रीजेश यांनी घेतला आहे.  पीआर श्रीजेश यांनी 2006 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकीमध्ये पदार्पण केलं. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ टीममध्ये पीआर श्रीजेश यांना 2010 मध्ये संधी मिळाली. तेव्हापासून भारतीय हॉकी संघात अनेक बदल होत गेले मात्र, पीआर श्रीजेश यांच्यावर भारतीय हॉकीच्या व्यवस्थापनाचा विश्वास कायम होता.

पीआर श्रीजेश यांनी भारतासाठी आतापर्यंत 328  मॅच खेळल्या आहेत. श्रीजेश यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये देखील सहभाग घेतला आहे. राष्ट्रकूल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वकप स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 

टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारताच्या हॉकी संघाला 41 वर्षानंतर कांस्य पदक मिळालं होतं, त्यामध्ये पीआर श्रीजेश यांचं योगदान महत्त्वाचं होतं. हॉकी इंडियानं 'विन इट फॉर श्रीजेश' अभियान सुरु केलं आहे.हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप टर्की यांनी संघातील इतर खेळाडू श्रीजेश यांना शानदार फेअरवेल देण्यासाठी प्रयत्न करतील, असं म्हटलं. 

संबंधित बातम्या :

Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाला श्रीलंका दौऱ्यात का संधी नाही? अजित आगरकरनं सगळं समजावून सांगितलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget