एक्स्प्लोर

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादविरुद्धचा विजय मुंबईसाठी खूप खास होता, कारण या विजयासह संघाने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम ठेवले आहे.

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyadrabad) आयपीएल 2024 चा चौथा विजय नोंदवला. हंगामातील 55 व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. हा विजय मुंबईसाठी खूप खास होता, कारण या विजयासह संघाने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. मात्र, येथून प्लेऑफसाठी पात्र ठरणे मुंबईसाठी कठीण काम आहे.

हैदराबादला पराभूत केल्यानंतर, मुंबईचा संघ 8 गुण आणि -0.212 च्या नेट रनरेटने गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होता. मुंबईने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये 4 सामन्यात विजय आणि 8 सामन्यात पराभव झाला आहे. अशा स्थितीत येथून प्लेऑफसाठी पात्र ठरणे संघासाठी सोपे नसेल. 

कुठल्या समीकरणाने मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो? (IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario)

सर्वप्रथम मुंबई इंडियन्सला त्यांचे उर्वरित दोन सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. जर संघ एकही सामना गमावला तर तिथून त्यांचा प्ले ऑफचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात येईल. पुढील दोन सामन्यांमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. दोन्ही सामने जिंकून मुंबईला 12 गुण मिळू शकतात.  सध्या हैदराबाद, लखनौ आणि चेन्नईचे 12-12 गुण आहेत. अशा परिस्थितीत यातील दोन संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने हरल्यास मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग खुला राहील.

उर्वरीत दोन सामन्यात मोठ्या विजयाची गरज-

मुंबईला पुढील दोन सामन्यांमध्ये केवळ विजयाची गरज नाही तर मोठ्या विजयाची गरज आहे, कारण सध्या संघाचा नेट रनरेट -0.212 आहे. अशा स्थितीत, संघाला मोठा विजय मिळवून धावगती सुधारावी लागेल, जेणेकरून नेट रनरेटद्वारे इतर संघांना मागे टाकून पात्रता मिळवता येईल. आता येथून मुंबई प्रत्यक्षात प्ले ऑफसाठी पात्र ठरते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो-

मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर हैदराबादला 7 गड्यांनी नमवले. सूर्यकुमार यादवने झंझावाती नाबाद शतक ठोकत मुंबईचा विजय साकारला. हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 173 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने 17.2 षटकांत 3 बाद 174 धावा केल्या. 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 31 धावांमध्ये मुंबईने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. इशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मात्र सूर्याचा शो सुरु झाला. सूर्यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आणि मुंबईला विजय मिळवून दिला. 

संबंधित बातम्या:

IPL 2024 Rohit Sharma: मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा; त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video

IPL 2024 Sunil Narine: सुनील नरेनने दारु पिऊन लखनौविरुद्ध 81 धावा केल्या?; व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य

IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni: '...तेव्हा संघासोबत जेवताना MS धोनी खूप रडला'; हरभजन सिंगने सांगितली आठवण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ, हार्दिक पांड्यानंतर सूर्यकुमार यादव संघाबाहेर? रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कॅप्टन होणार?
मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ, हार्दिक पांड्यानंतर सूर्यकुमार यादव संघाबाहेर? मुंबईचा नवा कॅप्टन कोण?
IPL Final Venue : आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनल मॅचची ठिकाणं ठरली, नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मे रोजी फायनल, बीसीसीआयची मोठी घोषणा
आयपीएलची फायनल बंगळुरु ऐवजी अहमदाबादमध्ये होणार, 31 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना, बीसीसीआयनं बदलाचं कारण सांगितलं
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Election Result : बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
Embed widget