एक्स्प्लोर

DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं

Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत गुजरात टायटन्स वरील विजयानंतर आनंदी दिसून आला. यावेळी त्यानं मॅच जिंकण्यासाठी काय प्लॅनिंग केलं होतं ते सांगितलं.

Rishabh Pant Reaction  अहमदाबाद: दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) आयपीएलमध्ये (IPL 2024) तिसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला (Gujarat Titans ) त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं. सहा विकेट आणि 11 ओव्हर बाकी ठेवून विजय मिळवल्यानं कॅप्टन रिषभ पंत आनंदी दिसून आला. रिषभ पंतनं मॅच संदर्भात काय प्लॅनिंग केलं होतं ते सांगितलं. 

दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात झाली नव्हती. त्यांना सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. रिषभ पंतनं कमबॅक केलं तर दिल्लीला सूर सापडत नव्हता. दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करुन विजयाचं खातं उघडलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांचा पराभव झाला. अखेर दिल्लीनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवले आहेत. लखनौ सुपर जाएंटसचा पराभव केल्यानंतर काल गुजरात टायटन्स बरोबर दिल्लीची मॅच होती. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातला सहा विकेटनं पराभूत केलं. 
  
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत म्हणाला की, गुजरात टायटन्सला 89 धावांवर बाद केल्यानंतर जेवढ्या लवकर मॅच जिंकता येईल तितक्या लवकर जिंकण्याचा आमचा प्रयत्न होता. 

आयपीएलच्या 32 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा हा निर्णय ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि ट्रिस्ट स्टब्स यांनी सार्थ ठरवला, त्यांनी गुजरातला 89 धावांवर बाद केलं. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं नवव्या ओव्हरमध्येच ही धावसंख्या पार केली.  

मॅचनंतर रिषभ पंत म्हणाला की, खुश होण्यासाठी आमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही चॅम्पियन सारखा विचार केला आणि आमच्या टीमनं आज आम्ही त्या प्रमाणं खेळू शकतो, हे दाखवून दिल्यानं खुश आहे. रिषभ पंतनं दिल्लीच्या बॉलर्सचं देखील कौतुक केलं. सध्या स्पर्धेची सुरुवात असून यामध्ये अजून सुधारणा करता येतील, असं म्हटलं.   

गुजरात टायटन्स विरुद्ध फलंदाजीला मैदानात उतरताना जेवढ्या लवकर मॅच संपवता येईल, तितक्या लवकर संपवण्याचा विचार केला होता. सुरुवातीच्या काळात आम्ही नेट रनरेटचे गुण गमावले होते, त्याची भरपाई करायची होती, असं रिषभ पंत म्हणाला. 

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधील विजयानंतर गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तीन विजय आणि तीन पराजयासह दिल्ली कॅपिटल्स सहा गुणांसह सहाव्या स्थानी आहे. रिषभ पंतला त्याच्या कप्तानी आणि विकेटकीपिंगसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

संबंधित बातम्या :

आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय

टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget