![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2022 : 66 सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचले दोनच संघ, 5 संघातील दोघांना पुढे जाण्याची संधी, कसं आहे संपूर्ण गणित?
IPL Playoffs : आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या संघानी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळवलं आहे.
![IPL 2022 : 66 सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचले दोनच संघ, 5 संघातील दोघांना पुढे जाण्याची संधी, कसं आहे संपूर्ण गणित? IPL 2022 Playoffs Gujrat titans and LSG in playoff rr rcb lsg pbks in race IPL 2022 : 66 सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचले दोनच संघ, 5 संघातील दोघांना पुढे जाण्याची संधी, कसं आहे संपूर्ण गणित?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/19/e1996400e3c236d6e77a9c154df6500d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Playoffs 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचे 66 लीग मॅचेस खेळवले गेले असून आता केवळ 4 सामने शिल्लक आहेय आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे दोन संघ पुढील फेरीत पोहोचले आहेत. तर मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद हे संघ स्पर्धेतून बाहेर पोहोचले आहेत. त्यामुळे आता केवळ उर्वरीत 4 सामन्यांमधून 5 संघातील दोन प्लेऑफचे संघ मिळणार आहेत.
प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे राजस्थान
राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. राजस्थानने आतापर्यंत 8 सामने जिंकले आहेत.त्यांचा नेट रन रेटही इतरांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ त्यांचा शेवटचा सामना जिंकल्यास त्यांच प्लेऑफमध्ये पोहोचणं फिक्स होईल. तसंच त्यांचा पराभव देखील झाला तरी त्यांचे पुढील फेरीत पोहचण्याचे चान्सेस अधिक आहेत. कारण इतर संघ त्यांच्यापासून पाठी आहेत. जर राजस्थान मोठ्या फरकाने शेवटचा सामना पराभूत झाले आणि दिल्ली, बंगळुरु मोठ्या फरकाने सामना जिंकले तरच गणित बदलेल.
चौथ्या स्थानासाठी दिल्ली, बंगळुरुत चुरस
दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघानी आतापर्यंत 7-7 सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी त्यामुळेच हे दोन्ही संघ आघाडीवर आहेत.या दोघांपैकी एकही संघ शेवटचा सामना जिंकल्यास हैदराबाद आणि पंजाब यांचे पुढील फेरीचे चान्सेस संपूर्णपणे संपतील. दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ शेवटचा सामना पराभूत झाल्यास इतर संघाना संधी मिळू शकते.
दिल्ली आणि बंगळुरु पराभूत झाल्यास आणखी चुरस वाढेल
दिल्ली आणि बंगळुरु या संघानी जर आपला शेवटचा सामना गमावला आणि पंजाब किंवा हैदराबादने त्यांचा शेवटचा सामना जिंकल्यास पुढील फेरीत पोहोचण्याची चुरस आणखी वाढेल. अशावेळी संघाच्या नेट-रनरेटवर सारं गणित अवलंबून असेल. सध्या तरी दिल्लीचा नेट रन रेट इतर चारही संघापेक्षा अधिक चांगला आहे. त्यामुळे दिल्लीची प्लेऑफमध्ये खेळण्याची आशा सर्वाधिक आहे. तर नेमकं गणित हे या सामन्यांनंतरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)