तिलक वर्मा प्रकरणात कोण खरं अन् कोण खोटं? हार्दिक पांड्या- जयवर्धनेच्या दाव्यांचा मेळ बसेना, सूर्यकुमारला बसला शॉक
तिलक वर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा असा फलंदाज आहे, जो निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला.

Tilak Varma Retired Out Call : तिलक वर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा असा फलंदाज आहे, जो निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला. आयपीएल 2025 च्या 16 व्या सामन्यात जेव्हा तिलक वर्मा लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे शॉट मारू शकला नाही. तेव्हा मुंबई इंडियन्सने त्याला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. 19 व्या षटकात त्याच्या जागी मिचेल सँटनरला पाठवण्यात आले. या निर्णयाने केवळ एमआय चाहतेच नव्हे तर संघात समाविष्ट सूर्यकुमार यादव देखील आश्चर्यचकित झाला. तिलकच्या निवृत्तीबद्दल मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी वेगवेगळी विधाने केली आहेत.
204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दोन्ही सलामीवीरांनी (विल जॅक्स, रायन रिकेलटन)17 धावांत आपले विकेट गमावले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी 69 धावांची भागीदारी केली. 24 चेंडूत 46 धावा करून नमन बाद झाला. यानंतर, सूर्यकुमार यादवसह तिलक वर्माने 66 धावा जोडल्या पण वर्माच्या बॅटमधून कोणतेही मोठे फटके आले नाहीत. 24 चेंडूत 52 धावांची गरज असताना, मुंबई येथून सामना जिंकू शकेल असे वाटत होते. पण 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्याची विकेट पडल्याने मुंबईवर दबाव आला. हार्दिक पांड्या हा पुढचा फलंदाज होता, पण आता तिलक वर्मा क्रीजवर असल्याने तो मोठे फटके मारेल अशी अपेक्षा होती. पण, तो तसे करू शकला नाही, त्यानंतर त्याला निवृत्त करून बाहेर पाठवण्यात आले.
मुंबई इंडियन्सच्या निर्णयाने सूर्यकुमार यादव झाला शॉक
19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला रिटायर आउट केले. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जयवर्धने सूर्यकुमार यादवकडे जातो आणि त्यांना याबद्दल सांगतो, तेव्हा सूर्यकुमार यादवलाही धक्का बसतो.
Indian T20i captain Suryakumar Yadav is not happy with the Tilak retire out decision.This is not how u give confidence to youngsters. MI if u still want to win trophies it's high time to sack Hardik and make SKY captain pic.twitter.com/JB4vf9CvBn
— Vikas Yadav (@imvikasyadav_1) April 5, 2025
हार्दिक तिलकवर काय म्हणाला?
तिलक मोठे फटके खेळण्यासाठी संघर्ष करत होता. त्याने 23 चेंडूत 25 धावा केल्या. याबद्दल विचारले असता हार्दिक म्हणाला, 'आम्हाला काही मोठे फटके मारण्याची गरज होती, पण तो ते करू शकला नाही. क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते यशस्वी होत नाही. फक्त चांगले क्रिकेट खेळा, मला ते सोपे ठेवायला आवडते.
जयवर्धने तिलकवर काय म्हणाला?
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाला की, 'आम्ही विकेट गमावल्या तेव्हा तिलकने आमच्यासाठी चांगली फलंदाजी केली आणि सूर्यासोबतची भागीदारीही चांगली होती. त्याला फक्त वेगवान धावा करायच्या होत्या, पण तो ते करू शकला नाही.
तो पुढे म्हणाला, 'शेवटच्या काही षटकांपर्यंत आशा होती कारण त्याने तिथे थोडा वेळ घालवला होता, त्यामुळे तो फटके मारू शकला असता. पण शेवटी मला एका नवीन खेळाडूची गरज भासली.
तिलकच्या जागी सँटनर मैदानात आला पण...
मुंबई इंडियन्स संघाने तिलक वर्माला परत बोलावले आणि मिशेल सँटनरला पुन्हा मैदानात पाठवले. सँटनर हा सामान्यतः फिरकी गोलंदाज आहे जो फलंदाजी देखील करतो. पण तिलकच्या जागी सँटनरला पाठवणे हा थोडा विचित्र निर्णय होता. सँटनरने क्रीजवर येऊन फक्त 2 चेंडू खेळले आणि त्याला फक्त दोन धावा करता आल्या.





















