एक्स्प्लोर

दुसऱ्या डावातही भारताची मदार विराट कोहलीवरच!

विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे.

बर्मिंगहॅम/मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर पहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टनवर भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटने एकहाती किल्ला लढवून झळकावलेल्या या शतकामुळेच इंग्लंडला पहिल्या डावात अवघी 13 धावांची आघाडी मिळाली. आता दुसऱ्या डावातही विराट कोहली अजूनही मैदानात उभा आहे. त्यामुळे भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम आहेत. अखेर विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत शतक ठोकून इंग्लिश भूमीवरची अपयशाची मालिका खंडित केली. टीम इंडियाच्या कर्णधाराचं इंग्लंड दौऱ्यातलं हे पहिलं शतक इतकं मोठं होतं की, त्याने इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांमधला धावांचा बॅलन्सही खुजा ठरला. विराट कोहलीला 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 134 धावाच जमवता आल्या होत्या. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूंना छेडण्याचा विराटचा कच्चा दुवा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी नेमका हेरला होता. त्यामुळे दहापैकी चार डावांत त्याला जेम्स अँडरसनने माघारी धाडलं. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस जॉर्डनने विराटचा प्रत्येकी दोनवेळा काटा काढला. आणि एकदा लियाम प्लन्केटने त्याची विकेट काढली होती. टीम इंडियाच्या कर्णधाराने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्याच डावात 149 धावांची खेळी उभारून इंग्लिश गोलंदाजांना सलामीलाच इशारा दिला. विराटने 225 चेंडूंमधल्या या खेळीला 22 चौकार आणि एका षटकाराचा साज चढवला. विराटच्या या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने वारंवार गार्ड बदलून इंग्लिश गोलंदाजांना पेचात पकडलं. त्याने शतकाआधी मोठा फटका खेळण्यासाठी खराब चेंडूची प्रतीक्षा केली. त्यामुळे विराटचं शतक साजरं झालं त्या वेळी तब्बल 40 चेंडूंवर त्याच्या नावावर एकही धाव नव्हती. त्यापैकी 26 चेंडू हे विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जेम्स अँडरसनचे होते. जगातला एक सर्वोत्तम स्ट्रोकप्लेयर असा विराटचा लौकिक आहे. आपल्या त्याच वैशिष्ट्याला मुरड घालून खेळण्याची चिकाटी भारतीय कर्णधाराने एजबॅस्टनवर दाखवली. त्यामुळेच समोरच्या एंडने खंबीर साथ न लाभूनही एकट्या विराट कोहलीने टीम इंडियाला इंग्लंडच्या धावसंख्येच्या वेशीवर नेऊन ठेवलं. विराट कोहलीने एजबॅस्टन कसोटीत उभारलेली खेळी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला कलाटणी देणारी ठरू शकते. भारतीय कर्णधाराने 2014 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अॅडलेड कसोटीत झळकावलेलं शतक ही त्याची आजवरची सर्वोत्तम खेळी मानली जाते. त्या कसोटीत 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने पाचव्या दिवशी शतक साजरं केलं होतं. पण भारताला चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला होता. विराटच्या मते, एजबॅस्टनवरचं शतक ही त्याची दुसरी सर्वोत्तम खेळी ठरावी. पण या शतकाने एजबॅस्टन कसोटी टीम इंडियाच्या बाजूने झुकवली, तर विराट कोहलीलाही आपलं मत बदलावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget