एक्स्प्लोर

WTC Final Venue: WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार नाही?; जय शहा यांची ICC सोबत चर्चा, नेमकं काय म्हणाले?

WTC Final Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

WTC Final Venue: भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (ICC World Test Championship) फायनलमध्ये दोनवेळा धडक दिली, परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. याचदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. (WTC Final Venue)

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे मागील दोन्ही अंतिम सामने इंग्लंडमध्ये झाले होते. 2019-2021 सत्राचा अंतिम सामना साउथहॅम्प्टन, इंग्लंड येथे झाला, तर 2021-2023 सत्राचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. तिसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमचीही निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसी अधिकाऱ्यांशी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत चर्चा केली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होणार?

प्रसारमाध्यमांशी बोलताना जय शाह यांनी सांगितले की, मी आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी बोललो असून ते स्थळ बदलण्याच्या विषयावर चर्चा करतील. मी WTCची फायनल 2027 इतर ठिकाणी आयोजित करण्याच्या मुद्द्यावर आयसीसी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, जगात कसोटी क्रिकेटची फक्त 3 मुख्य केंद्रे आहेत. यामध्ये जी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताचा समावेश आहे. जय शहा यांनी सांगितले की, जेव्हा अंतिम सामना होतो, तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि भारतात पावसाळा असतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी WTCचा अंतिम सामना होऊ शकत नाही. 

भारताचा दोनदा पराभव-

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. त्या कमी धावसंख्येच्या सामन्यात, न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवून इतिहासातील पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला. 2023 मध्ये दुसऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. यावेळी कांगारूने भारताचा 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

भारत तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्याच्या मार्गावर-

2023-2025 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकली, तर भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 6 विजय नोंदवले आहेत आणि सध्या 68.52 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया सध्या या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 62.5 टक्के सामने जिंकले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या:

'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!

Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget