एक्स्प्लोर

Virat Kohli Vs BCCI : कोहली, गांगुली की आणखी कोण, भारतीय क्रिकेट संघात वादाची वात कोणी पेटवली?

भारतीय क्रिकेट संघात एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात विराट कोहलीने पत्रकार परिषद घेत केलेल्या खुलाशानंतर तर धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Virat Kohli Vs BCCI : भारतीयांसाठी क्रिकेट हा त्यांचा सर्वात आवडीचा खेळ. हा खेळ खेळणचं नाही तर, पाहणं किंवा त्यावरच्या चर्चा अशा साऱ्याच गोष्टींना भारतात तुफान प्रतिसाद मिळतो. भारतीयही आपल्या लाडक्या खेळाडूंवर आणि संघावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण याच भारतीय संघात मागील काही महिन्यांपासून वेगवेगळे वाद असल्याचं समोर येत आहे. आता या वादांच्या मागे कोण आहे?, कोणाची चूक आहे? अशा एक न अनेक प्रश्नांची उत्तरं भारतीय क्रिकेट प्रेमींना हवी आहेत...

तर टी20 विश्वचषक होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकानंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं घोषित केलं. पण एकदिवसीय संघ आणि कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाबाबत त्याने काहीच सांगितलं नव्हतं. पण नुकतंच आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला, यावेळी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहितचं नाव घोषित करण्यात आलं आणि पाहता पाहता भारतीय क्रिकेट संघात काही तरी वाद आहे, विराट विरुद्ध रोहित, विराट विरुद्ध बीसीसीआय, सौरव गांगुली विरुद्ध विराट अशा अनेक वादांबाबत चर्चा होऊ लागली. त्यात विराटने पत्रकार परिषद घेतल्यानंतर केलेल्या विविध खुलाश्यांमुळे तर नक्कीच काहीतरी मोठा वाद सुरु आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे.
 
काय म्हणाला विराट कोहली?

एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराटकडून रोहितकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराटच्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष होतं. ज्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने बरेच खुलासे केले. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदिसीय संघाचं कर्णधारपद माझ्याकडून काढून घेताना कोणतीच चर्चा झाली नव्हती. आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाच्या चर्चेबाबत फोन केला असता शेवटच्या पाच मिनिटांत तू वन-डेचा कर्णधार नसशील एवढं कळवण्यात आलं. दरम्यान याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटसोबत एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. जे वक्तव्य विराटच्या खुलाशामुळे खोटं ठरलं आहे. 

याशिवाय विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडतानाही बीसीसीआयला कळवलं होतं. तेव्हाही बीसीसीआयने केवळ होकार देत यावर कोणतीच चर्चा केली नव्हती, असंही विराट म्हणाला. तसंच आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय सामने खेळताना विराटला विश्रांती हवी आहे, तसंच त्याच्या मुलीचा वाढदिवस यादरम्यान असल्यानं त्याला सुट्टी हवी आहे. अशा बातम्याही समोर येत होत्या. यावर बोलताना विराटने मी अशी कोणतीच विनंती केली नसून एकदिवसीय संघातून खेळण्यासाठी मी तयार असल्याचं विराट म्हणाला. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये नक्कीच काहीतरी खटकत असल्याची शक्यता अजून दृढ झाली आहे.

विराट vs रोहित?

भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अव्वल दर्जाचे फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. पण या दोघांमध्येच आता वाद असल्याच्या चर्चा होत आहेत. याला कारणही तसंच आहे. कारण विराटकडे असणारं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद अचानक रोहित शर्माला देण्यात आलं. ज्यामुळे विराट फॅन्सतर नाराज झालेच. पण त्याच दरम्यान विराट आगामी आफ्रिका दौऱ्यात खाजगी कारणांमुळे एकदिवसीय संघात खेळणार नसल्याचं समोर आलं. अर्थात आता विराटने हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं असलं तरी आधी मात्र या वृत्तामुळे विराटला रोहितच्या नेतृत्त्वाखाली खेळायचे नाही अशीच चर्चा होत होती. दुसरीकडे रोहितही दुखापतीमुळे कसोटी संघातून बाहेर झाला. ज्यानंतर रोहितलाही विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळायचं नाही अशी चर्चा सुरु झाली. अर्थात या चर्चांमध्ये तथ्य नसलं तरी खरचं वाद आहे का? ही शक्यताही नाकारता येत नाही.

बीसीसीआयचं म्हणणं काय?

कर्णधारपदाच्या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने टी20 संघाचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं. ज्यानंतर मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार म्हणजे टी20 साठी रोहित आणि वन-डेसाठी विराट असल्यास संघाच्या खेळावर परिणाम होऊल त्यामुळे रोहितकडेच दोन्ही जबाबदाऱ्या दिल्याचं म्हटलं आहे.    

संबधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget