एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?

T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता आणि भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता होणार आहे.

T20 World Cup 2024: IND vs ENG: T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना वेस्ट इंडिजमधील गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनने (ICC) दुसऱ्या सेमीफायनलसाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नसल्याचा हा विषय चर्चेला आला आहे. तसेच भारत आणि इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे.

भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट-

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता आणि भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता होणार आहे. जर आपण हवामानाचा अंदाज पाहिल्यास, पुढील आठवडाभर गयानामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. भारत-इंग्लंड सामना गुरुवारी होणार असून या दिवशीही गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गयाना जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या भागात महिन्यातील 30 पैकी सरासरी 23 दिवस पाऊस सतत सुरू असतो. या वृत्तामुळे दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.

27 जून रोजी हवामान कसे असेल?

27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये 75 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना सुरू असताना हवामान चांगले राहण्याची अपेक्षा असली तरी सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्यास मैदान ओले असल्याने खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. गयानामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पावसाची 35-68 टक्के शक्यता आहे.

सामना रद्द झाला तर?

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आयसीसीने जाहीर केले होते की त्याच दिवशी दुसरा उपांत्य सामना आयोजित करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जातील आणि या प्रयत्नात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला. हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तरी भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. एकही सामना न खेळता आणि विजयाची नोंद न करताही, टीम इंडियाला अंतिम फेरीत स्थान दिले जाईल कारण त्यांनी सुपर-8 मध्ये इंग्लंडपेक्षा जास्त गुण मिळवले होते. त्यामुळे भारताला आता याचा फायदा होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024: 10 वाजता मैदानातच लोळत पडला, चालताही येईना, 10.30 वाजता पळ पळ पळाला, गुलबदीन नईबच्या ॲक्टिंगने 'ऑस्कर'लाही लाजवलं!

T20 World Cup 2024 AFG vs BAN: ते एकमेव व्यक्ती म्हणाले, आम्ही सेमी फायनल गाठू; आम्ही भेटलो, शब्द दिला अन् आज...; राशिद खान काय म्हणाला?

T20 World Cup 2024 AFG vs BAN: हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले कांगारु, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.