एक्स्प्लोर

IND Vs SA: सलग दोन सामन्यात पराभव, पण तरीही टीम इंडिया नाही बदलणार त्यांचा गेम प्लॅन; श्रेयस अय्यर म्हणतोय...

IND Vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मलिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका 'करो या मरो'च्या स्थितीत पोहोचलीय.

IND Vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मलिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघासाठी ही मालिका 'करो या मरो'च्या स्थितीत पोहोचलीय. पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारूनही भारताचा पराभव झाला. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजक कागगिरी करून दाखवली. ज्यामुळं भारताचा पराभव पत्कारावा लागला. या मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकायचा आहे. मात्र, तरीही भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात आपला गेम प्लॅन बदलणार नसल्याचं भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरनं संकेत दिले आहेत. 

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 0-2 नं पिछाडीवर आहे. अय्यर म्हणाला की, "आम्ही नियोजन केले आहे की, काहीही झाले तरी आम्ही आक्रमक फलंदाजी करत राहू. जरी आम्ही विकेट गमावत राहिलो तरीही आम्ही आमच्या गेम प्लॅननुसार खेळ करू आणि पुढे जाऊ. आम्ही आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू." या मालिकेनंतर भारताच्या फलंदाजीचा प्लॅन बदलेल का, असं विचारलं असता अय्यर म्हणाला, "आमचे मुख्य उद्दिष्ट साहजिकच विश्वचषक आहे, त्यामुळं आम्ही त्यासाठी नियोजन करतो का ते पाहावं लागेल. त्यामुळे आमची अशी मानसिकता आहे जिथे आम्ही पूर्णपणे मुक्तपणे खेळत आहोत. आणि इतर कशाचाही विचार करत नाही."

दुसऱ्या टी-20 मालिकेत दिनेश कार्तिकला अक्षर पटेलनंतर फलंदाजीसाठी पाठवलेल्या ऋषभ पंतच्या निर्णयावर अनेक दिग्गज फलंदाजांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, "भारत शेवटच्या पाच षटकांमध्ये दिनेश कार्तिकचा विशेष फलंदाज म्हणून वापर करू पाहत आहे." दुसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलनं 11 चेंडूत अवघ्या 10 धावा केल्या. तर, दिनेश कार्तिकनं 21 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला. 
 
ऋषभ पंतच्या निर्णयावर सुनील गावस्कर नाराज
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, "अक्षर पटेलच्या आधी दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं. “कधीकधी तुम्ही खेळाडूंवर फिनिशर असल्याचा टॅग लावता. तसेच 15 व्या षटकानंतरच त्याला फलंदाजीला पाठवता येईल, असा विश्वास दाखवता. पण गरज भासल्यास अशा खेळाडूला लवकर पाठवण्याची गरज असते. त्याच्या मते तो खेळ समजून डाव पुढे घेऊन जाता येतो."

गौतम गंभीर काय म्हणाला?
गौतम गंभीरनंही ऋषभ पंतच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. "तुम्ही कार्तिकला फक्त शेवटच्या तीन षटकांसाठी ठेवू शकत नाही. जर तुमच्याकडं फलंदाज असतील, तर त्याला 6 व्या क्रमांकावर पाठवा. कठीण परिस्थितीत तुम्हाला अधिक संधी असते", असं गंभीरनं म्हटलंय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget