एक्स्प्लोर

World Cup Squad 2023 : विश्वचषकात टीम इंडियासाठी फिरकी गोलंदाजीच ठरणार कमकुवत बाजू?

India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषक स्पर्धा 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीबाबत आताच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मुंबई भारतात 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अजिंक्यपद पटकावले. कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात भारतीय गोलंदाजी अतिशय प्रभावी ठरली होती. त्यात फिरकीपटूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाची यशस्वी ठरेल का, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. फिरकीत वैविध्य नसल्याचा फटका बसू शकतो, अशी भीती चाहते व्यक्त करत आहेत. 

2011 चा विश्वचषक भारतामध्ये झाला होता. धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयात फिरकी गोलंदाजांचा मोठा वाटा होता. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 2011 च्या विश्वचषकात एकूण 34 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक विकेट युवराज सिंह याच्या नावावर होत्या. युवराज याने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. तर हरभजन सिंह याने नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय अश्विन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी चार चार विकेट घेतल्या होत्या. सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांना एक एक विकेट मिळाली होती. ऑफ स्पिनरने 15 पेक्षा जास्त विकेट घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

आताच्या संघाचा विचार करता भारतीय फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसतेय. भारताने कुलदीप यादव हा एकमेव फिरकी स्पेशालिस्ट घेतलाय. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल त्यांच्या जोडीला आहेत. पण हे दोन्ही गोलंदाज एकाच धाटणीचे आहेत. 2011 च्या विश्वचषकात भारताकडे अश्विन, हरभजन, पियुष चावला आणि युवराज सिंह असे विविधता असणारे फिरकी गोलंदाज होते. प्रत्येक गोलंदाजाची शैली आणि ताकद वेगळी होती. पण सध्या भारताकडे फिरकीचे फक्त तीन पर्याय असल्याचे दिसतेय. आघाडीचा कोणताही फलंदाज गोलंदाजी करत नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे मर्यादा असल्याचे स्पष्ट होतेय. याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघ घेऊ शकतात. 

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान संघात भरभरुन डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजाविरोधात ऑफ स्पिन गोलंदाजी प्रभावी ठरते, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. असे असतानाही टीम इंडियात एकाही ऑफ स्पिनरला स्थान देण्यात आलेलं नाही. इतकेच काय टीम इंडियात लेग स्पिनरही घेतला नाही. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल मधल्या षटकात डावखुऱ्या फलंदाजाविरोधात किती प्रभावी गोलंदाजी करु शकतील, याबाबत शंकाच आहे. या दोघांपैकी एकालाही मार पडला तर गोलंदाजीचे गणित बिघडू शकते. 

2011 च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने घेतल्या होत्या. शाहीद आफ्रिदी आणि युजवेंद्र चहल एकाच धाटणीचे गोलंदाज आहेत. दोघेही लेगस्पिनर आहेत. पण चहल सोडा... अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला का संधी मिळाली नाही, याची सध्या चर्चा सुरू आहे. 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. अश्विन तळाला चांगली फलंदाजीही करु शकतो. त्याशिवाय भारतीय खेळपट्टीवर अश्विनसारखा दुसरा प्रभावी गोलंदाज नाही. पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करण्याची क्षमता अश्विनकडे आहे. त्याशिवाय तो फलंदाजीतही निपुण असल्याचे अनेकदा सिद्ध केलेय. पण अश्विनलाही संधी मिळाली नाही. 

2011 विश्वचषकात फिरकीची कमाल पाहायला मिळाली होती. संपूर्ण स्पर्धेत जवळपास 47 टक्के चेंडू फिरकी गोलंदाजांनी टाकले होते. स्पर्धेतील 11 हजार 901 चेंडू फिरकी गोलंदाजांनी टाकले होते. 2011 च्या विश्वचषकात 43 टक्के विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या. स्पर्धेतील 290 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या.  2011 च्या विश्वचषकात भारतीय फिरकी गोलंदाजी प्रभावी नव्हती... पण तरिही 34 विकेट घेतल्या होत्या. हरभजन सिंह आणि युवराज या जोडीने कमाल केली होती. त्यांच्या जोडीला अश्विन, चावला, रैना यासारखे पर्याय होते. यंदाच्या विश्वचषकात भारताच्या फिरकी गोलंदाजीचा भार कुलदीप, जाडेजा आणि अक्षर यांच्यावर असेल. हे गोलंदाज कशी कामगिरी करतात? यावर भारताच्या विश्वचषकाचे भवितव्य आहे. गेल्या काही दिवसांत कुलदीप यादव याने दमदार कामगिरी केली आहे. जाडेजानेही आपले योगदान दिलेय. अक्षर पटेल भारतीय खेळपट्टीवर प्रभावी झालाय.. पण फिरकी गोलंदाजीत विविधता दिसत नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसतो की नाही? हे दोन महिन्यात स्पष्ट होईलच.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
Devendra Fadnavis at Davos: देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
Embed widget