एक्स्प्लोर

Ind vs Ban 2nd T20 : ग्वाल्हेरनंतर टीम इंडियाने जिंकला दिल्लीचा किल्ला; बांगलादेशचा सुपडा साफ, टी-20 मालिका 2-0 ने भारताच्या खिशात

India vs Bangladesh 2nd Test : भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला आहे.

India vs Bangladesh 2nd Test : कसोटी मालिकेनंतर आता टीम इंडियाने बांगलादेशला टी-20 मालिकेतही गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. ग्वाल्हेरनंतर टीम इंडियाने दिल्लीचा किल्ला पण सहज जिंकला. या विजयासह टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली. नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला होता.

नितीश रेड्डी आणि रिंकू सिंगचा तांडव

टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा 25 धावा होईपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. सॅमसन 10 धावा करून बाद झाला तर अभिषेक शर्मा 15 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार सूर्यकुमार यादवही 8 धावा करून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी मिळून अवघ्या 48 चेंडूत 108 धावा करून भारताला सामन्यात आणले. नितीशने 34 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले. दुसरीकडे रिंकूने 29 चेंडूत 53 धावा केल्या.

शेवटच्या 8 षटकात 99 धावा 

एकवेळ टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेट गमावून 122 धावा होती. पुढच्याच षटकात मेहदी हसनने 26 धावा दिल्या. इथून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत राहिला. अखेरच्या 8 षटकांमध्ये भारतीय संघाने तुफानी शैलीत फलंदाजी करत एकूण 99 धावा केल्या. 14व्या षटकात 74 धावा काढून नितीश बाद झाला, पण हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंगने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. हार्दिकने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. 19व्या षटकापर्यंत टीम इंडियाने 213 धावा केल्या होत्या आणि भारतीय संघ 230 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात एकूण 3 विकेट पडल्या, त्यामुळे टीम इंडियाला स्कोअरबोर्डवर 221 धावा करता आल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 2-2 विकेट घेतल्या.

बांगलादेशची फलंदाजी ठरली अपयशी

222 धावांचे मोठे लक्ष्य समोर होते आणि अशा स्थितीत बांगलादेश संघ दडपणाखाली गेला. अर्शदीप सिंगने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने इमनला बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही विकेट घेतली. वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत 4 षटकात फक्त 19 धावा देत 2 बळी घेतले. तसेच अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. नितीश रेड्डीनेही 2 बळी घेतले. बांगलादेशच्या महमुदुल्लाशिवाय क्रीझवर जात काळ कोणी टाकू शकले नाही. लिटन दास, शांतो, मेहदी हसन यांना सुरुवात मिळाली पण त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. अखेर टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली.

हे ही वाचा -

Nitish Kumar Reddy Ind vs Ban : 6,6,6,6,6,6... राजधानीत नितीश रेड्डीचा धमाका! दुसऱ्याच सामन्यात 11 चेंडूत ठोकल्या 58 धावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Embed widget