एक्स्प्लोर

IND Vs NZ WTC 2021 Final : टीम इंडियासाठी अश्विन-जाडेजा ठरणार गेम चेंजर; दिग्गज फिरकीपटूचा दावा

दिलीप दोशी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. "या कठीण वातावरणातही रोहित शर्मा, कोहली आणि रहाणे यांनी चांगली कामगिरी केली तर शुभमन गिलनेही ठसा उमटविला", असं दोशी म्हणाले.

IND Vs NZ WTC 2021 Final: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्य स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत दोन फिरकीपटूंसोबत खेळण्याच्या भारताच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या माजी डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशी यांनी मात्र दोन फिरकीपटू खेळवण्याच्या निर्णयाला सर्मथन दिलं आहे.

दिलीप दोशी यांच्या मते, चॅम्पियनशिपच्या या अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची भूमिका फार मोठी असणार आहे. दिलीप दोशी हे भारताचे असे खेळाडू आहे की, त्यांनी इतर भारतीयांपेक्षा इंग्लंडमध्ये जास्त क्रिकेट खेळले आहेत. दोशी यांनी सांगितले की, ‘भारताला प्रत्येक रनसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या सामन्यात जडेजा आणि अश्विनची मोठी भूमिका असेल असे मला वाटते.’

दिलीप दोशी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. "या कठीण वातावरणातही रोहित शर्मा, कोहली आणि रहाणे यांनी चांगली कामगिरी केली तर शुभमन गिलनेही ठसा उमटविला", असं दोशी म्हणाले.

न्यूझीलँडच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 विकेट्सवर 101 धावा, कॉन्वेचं अर्धशतक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे.  पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. यानंतर न्यूझीलँडनं सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँडकडून टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात करुन दिली.  टॉम लॅथमला अश्विनने 30 धावांवर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं.  लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विल्यमसनच्या साथीनं डेव्हन कॉन्वेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाच्या शेवटच्या षटकात इशांत शर्माने कॉन्वेला 54 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलँडने 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँड अद्याप 116 धावांची पिछाडीवर आहेत. सध्या विल्यमसन 12 तर  रॉस टेलर शून्यावर खेळत आहेत.

जेमिसन वादळ ; भारताचा पहिला डाव गडगडला 

भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून  माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला. उपाहारानंतर जेमिसनने  इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी  ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 

वाचा :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड, धोनीलाही टाकलं मागे

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
Mumbai Indians IPL 2026 : IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
Shreyas Iyer News : टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
WTC Points Table : एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?
एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget