![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND vs IRE, 2nd T20, Pitch Report : आज रंगणार भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर
IND vs IRE : भारतीय संघ आणि आयर्लंड यांच्यात आज रंगणारा दुसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना कोण जिंकणार यावर मालिका भारत जिंकणार की अनिर्णीत सुटणार हे स्पष्ट होईल.
![IND vs IRE, 2nd T20, Pitch Report : आज रंगणार भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर In India vs ireland 2nd t20 know pitch details and weather report IND vs IRE, 2nd T20, Pitch Report : आज रंगणार भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/03219dc812457047a0354c21821c75b6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs IRE : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यात पहिला टी20 सामना भारताने जिंकल्यानंतर आज दुसरा सामना पार पडणार आहे. आयर्लंडच्या होमग्राऊंडवर हा सामना खेळवला जाणार असून पहिल्या सामन्यात आयर्लंडने कडवी झुंज दिल्याने आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. आयर्लंडमधील द व्हिलेज, डबलिन क्रिकेट स्टेडियमवर (Castle Avenue, Dublin) हा सामना खेळवला जाणार असून आजवर आयर्लंडने एकदाही भारताला मात दिलेली नसली तरी पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने आज होमग्राऊंडवर आयर्लंड विजयी होईल का? हे पाहावे लागेल. पण आयर्लंडमध्ये पावसाळी वातावरण असल्याने सामना सुरु होण्यावर आणि वेळेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
कशी आहे मैदानाची स्थिती?
आयर्लंडच्या द व्हिलेज, डबलिन क्रिकेट स्टेडियमवर आज सामना होणार असून या ठिकाणी आजवर चार टी20 सामने झाले असून यात एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला असून तीन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात मैदानाच्या खेळपट्टीवर गवत अधिक असल्याने गोलंदाजांना फायदा होतोच पण फलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. पहिल्या सामन्यातही हार्दिक फलंदाजी घेऊ इच्छित होता, पण पावसाच्या वातावरणामुळे त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आज नेमकं कोण नाणेफेक जिंकेल? आणि कोणता निर्णय़ घेईल हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.
आतापर्यंत भारत विरुद्ध आयर्लंड
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 4 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण चार पैकी चारही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)