एक्स्प्लोर

एकटा रोहित ट्रॉफी जिंकून देऊ शकत नाही, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचं वक्तव्य, विजयाचा मार्ग देखील सांगितला

T-20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. भारतानं 2007 मध्ये पहिल्या वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. 

नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2024) समारोप झाल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप (T20 Cricket) सुरु होत असल्यानं क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे. वेस्ट इंडिज आण अमेरिका यांच्याकडून टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणारआहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांना पाच गटांमध्ये विभागण्यात आलंय. भारतीय क्रिकेट संघ अ गटात आहे. भारतासोबत या गटात पाकिस्तान, कॅनडा, अमेरिका  आणि आयरलँडचा समावेश आह. भारताची पहिली मॅच 5  जूनला होणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारताला पहिला टी-20 वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडियाबाबत (Team India) मोठं वक्तव्य केलं आहे. पहिल्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) एकटा रोहित शर्मा विजय मिळवून देऊ शकत नाही, असं म्हटलंय. भारतानं काय केलं तर विजय मिळू शकतो याबाबत त्यादेखील त्यानं भाष्य केलंय.

हरभजन सिंग काय म्हणाला?

भारतानं पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तनला पराभूत करत विजय मिळवला होता. भारताच्या त्या टीमचा सदस्य असलेल्या हरभजन सिंगनं रोहित शर्मा आणि टीम इंडियानं धोनीनं ज्या प्रकारे सर्वांना सोबत घेत सांघिक कामगिरी करत विजेतेपद मिळवलं तशा प्रकारे खेळल्यास विजय मिळू शकतो असं म्हटलं. 


हरभजन सिंगनं अलकीडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलंय. भारताचा सध्याच्या कॅप्टन रोहित शर्मा यानं धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सांघिक कामगिरीली प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. 


रोहित शर्मा एकटा आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही. मी नाही आपण सर्व अशी भावना ठेवणं भारतीय टीमसाठी आवश्यक असल्याचं हभजन सिंग म्हणाला. आपण किंवा आम्ही या भावनेनं खेळल्यास आपण मोठी गोष्ट मिळवू शकतो, असं हरभजन सिंग म्हणाला. 

आयपीएल स्पर्धा थकवणारी

हरभजन सिंगनं आयपीएल स्पर्धेच्या स्वरुपावर देखील भाष्य केलं. हरभजन सिंग म्हणाला की प्रामाणिकपणे सांगायचं तर आयपीएलचं स्वरुप थकवणार आहे. आयपीएल खेळल्यानंतर खेळाडूंमध्ये थकवा जाणवतो याचा परिणाम भारताच्या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीवर देखील होऊ शकतो, असं हरभजन सिंग म्हणाला. 


आयपीएल ही थकवणारी स्पर्धा आहे, प्रवास हे देखील गोष्ट थकवा आणणारी आहे. खेळाडू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकेलेले असतात, असं हरभजन सिंग म्हणाला. 

वर्ल्ड कपपेक्षा मोठं काही नसतं, तिथं तुम्हाला तुमचं बेस्ट योगदान द्यायचं असतं. तुम्हाला ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी चांगली बॉलिंग, बॅटिंग आणि फील्डिंग करावी लागेल, असं हरभजन सिंग म्हणाला.वर्ल्ड कप जिंकणं सोपं नसतं, तुम्हाला मानसिक दृष्ट्या मजबूत असणं आवश्यक आहे, असं हरभजन सिंग म्हणाला.

संबंधित बातम्या :

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget