एक्स्प्लोर

Arshdeep Singh : अर्शदीप सिंगचा धक्कादायक निर्णय! इन्स्टावरील 200 पोस्ट डिलीट, विराटसोबतचा खास क्षणही गायब, नेमकं काय लपवत आहे स्टार गोलंदाज?

Arshdeep Singh deleted 200-plus Instagram posts : अर्शदीप सिंग सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सोशल मीडियावरील वादांमुळेच जास्त चर्चेत आला आहे.

Arshdeep Singh deleted 200-plus Instagram posts : भारतीय संघ आणि पंजाब किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सोशल मीडियावरील वादांमुळेच जास्त चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यापासून ते चाहत्यांसोबतच्या ऑनलाइन वादापर्यंत, गेल्या काही आठवड्यांत अर्शदीप सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिला आहे.

अर्शदीपचा धक्कादायक निर्णय (Arshdeep Singh deleted Instagram posts)

या सततच्या टीका आणि वादांच्या पार्श्वभूमीवर अर्शदीप सिंगने मोठं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील 200 हून अधिक पोस्ट डिलीट किंवा आर्काइव्ह केल्या आहेत. विशेष म्हणजे, यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सोबतच्या 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याचा प्रचंड व्हायरल झालेला रील व्हिडिओदेखील गायब झाला आहे.

अचानक गायब झालं इंस्टाग्राम प्रोफाइल(Arshdeep Singh deleted Instagram posts)

अर्शदीपच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या अकाउंटवर शेकडो पोस्ट होत्या, पण आता फक्त 44 पोस्ट दिसत आहेत. साधारणपणे सेलिब्रिटी ब्रँड मेकओव्हर किंवा वादानंतर सोशल मीडिया क्लीन करतात, मात्र अर्शदीपच्या बाबतीत हे अलीकडच्या ट्रोलिंगशी जोडून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे, या निर्णयावर ना अर्शदीपने ना त्याच्या पीआर टीमने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

नेमका काय होता तिलक वर्मा वाद?

या महिन्याच्या सुरुवातीला अर्शदीपने भारतीय खेळाडूंमधील हलक्याफुलक्या मजेशीर क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, त्या व्हिडिओतील काही शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला. व्हिडिओमध्ये अर्शदीपने तिलक वर्माला मजेत अंधेरा असं म्हटलं होतं. त्याने तिलकला सनस्क्रीन लावली का?”असाही सवाल केला होता. त्यानंतर नमन धीरकडे बोट दाखवत त्याला “पंजाबचा खरा ग्लो” म्हटलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी अर्शदीपवर रंगभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आणि त्याला जोरदार ट्रोल केलं. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अर्शदीप आणि तिलक वर्मा दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे.

विकेट मिळाल्या, पण धावाही भरपूर दिल्या....

पंजाब किंग्सकडून खेळताना अर्शदीपसाठी आयपीएल 2026 हंगाम संमिश्र आणि महागडा ठरला. 14 सामन्यांत 14 विकेट घेत तो संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला, पण त्याची इकॉनॉमी तब्बल 10.20 इतकी खराब राहिली. अनेक सामन्यांत त्याची लाईन-लेंथ बिघडलेली दिसली आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने भरपूर धावा दिल्या. मागील हंगामात उपविजेतेपद पटकावणाऱ्या पंजाब किंग्सने यंदा सुरुवातीच्या 7 पैकी 6 सामने जिंकूनही अखेरीस अवघ्या 1 गुणाने प्लेऑफची संधी गमावली. त्यामुळे संघासोबतच अर्शदीपवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा -

RCB vs GT Qualifier 1 : मॅच न खेळता आरसीबी जाणार फायनलमध्ये? क्वालिफायर-1 सामन्यापूर्वी धर्मशालामधून आली मोठी बातमी, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget