एक्स्प्लोर

Asia cup 2018 : आशिया चषकातून पाकचं विसर्जन करा

आशिया चषकाच्या सुपर फोरच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत.

दुबई : आशिया चषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.

आशिया चषकाच्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला, तर पाकिस्तानही अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर पाकिस्तानला हरवावंच लागेल.

रोहित शर्माच्या टीम इंडियानं प्राथमिक साखळीत पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या निकषावर पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

आशिया चषकामध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी आपलं योगदान दिलं आहे. सलामीचे फलंदाज रोहीत शर्माने सलग दोन अर्धशतकं ठोकली आहेत तर शिखर धवनने आशिया चषकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.

मधल्या फळीत अंबाती रायडू, दिनेश कार्तिकमध्ये संघाला गरजेच्या वेळी चांगली खेळी करण्याची क्षमता आहे. महेंद्रसिंग धोनीनेही शुक्रवारी बांगलादेशविरोधात 33 धावा केल्या. तर दुसरीकडे केदार जाधवने ऑलराउंडरची भूमिका चोख बजावली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, बऱ्याच वेळानंतर संघात परतलेल्या रवींद्र जाडेजानं संधीचं सोनं केलं आहे. जाडेजानं बांगलादेशविरुद्ध चार विकेट घेत सामना एकतर्फी केला होता. भारतीय जलद गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर आहे.

पाकिस्तानच्या वन डे क्रिकेटमधला बाऊन्स बॅकचा आजवरचा इतिहास हा टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. त्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर मात करून आपण टीम इंडियाचा पुन्हा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.

आशिया चषकाच्या साखळीत पाकिस्ताननं टीम इंडियाकडून स्वीकारलेल्या लाजिरवाण्या पराभवासाठी, प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडली नाही, असा ठपका त्यांनी ठेवला होता.

आर्थर यांच्या मते, पाकिस्तानच्या सहापैकी चार प्रमुख फलंदाजांनी त्यांना दिलेली भूमिका सोडून खेळ केला. त्यामुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नव्हतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG Semi Final Turning Point : एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget