एक्स्प्लोर

Asia cup 2018 : आशिया चषकातून पाकचं विसर्जन करा

आशिया चषकाच्या सुपर फोरच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत.

दुबई : आशिया चषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.

आशिया चषकाच्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला, तर पाकिस्तानही अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर पाकिस्तानला हरवावंच लागेल.

रोहित शर्माच्या टीम इंडियानं प्राथमिक साखळीत पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या निकषावर पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

आशिया चषकामध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी आपलं योगदान दिलं आहे. सलामीचे फलंदाज रोहीत शर्माने सलग दोन अर्धशतकं ठोकली आहेत तर शिखर धवनने आशिया चषकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.

मधल्या फळीत अंबाती रायडू, दिनेश कार्तिकमध्ये संघाला गरजेच्या वेळी चांगली खेळी करण्याची क्षमता आहे. महेंद्रसिंग धोनीनेही शुक्रवारी बांगलादेशविरोधात 33 धावा केल्या. तर दुसरीकडे केदार जाधवने ऑलराउंडरची भूमिका चोख बजावली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, बऱ्याच वेळानंतर संघात परतलेल्या रवींद्र जाडेजानं संधीचं सोनं केलं आहे. जाडेजानं बांगलादेशविरुद्ध चार विकेट घेत सामना एकतर्फी केला होता. भारतीय जलद गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर आहे.

पाकिस्तानच्या वन डे क्रिकेटमधला बाऊन्स बॅकचा आजवरचा इतिहास हा टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. त्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर मात करून आपण टीम इंडियाचा पुन्हा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.

आशिया चषकाच्या साखळीत पाकिस्ताननं टीम इंडियाकडून स्वीकारलेल्या लाजिरवाण्या पराभवासाठी, प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडली नाही, असा ठपका त्यांनी ठेवला होता.

आर्थर यांच्या मते, पाकिस्तानच्या सहापैकी चार प्रमुख फलंदाजांनी त्यांना दिलेली भूमिका सोडून खेळ केला. त्यामुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नव्हतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी
ICC नं WTC फायनलची तारीख आणि स्टेडियम ठरवलं, गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी, भारत कितव्या स्थानी? 
ICC नं WTC फायनलची तारीख आणि स्टेडियम ठरवलं, भारत अंतिम सामन्यात पोहोचणार का? गुणतालिकेत कितव्या स्थानी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget