एक्स्प्लोर
Sumangalam Lokotsav : "येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता, सेंद्रीय शेती हाच उपाय"
येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रीय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले.
Sumangalam Lokotsav
1/10

पूर्वीच्या काळी जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे पूजन आणि रक्षण केले जात असे. परंतु, सध्या पंचतत्त्वांना हानी पोहोचवली जात असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. नीर, नारी आणि नदीला महत्व मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी सुमंगलम लोकोत्सवात केले.
2/10

पर्यावरण रक्षणाचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला देवून पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा. येत्या काळात पाण्याचा जपून वापर केला नाही तर पाण्यासाठी महायुद्ध होऊ शकते, असा इशारा कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिला.
3/10

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
4/10

कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
5/10

यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
6/10

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रीय शेतीपद्धती तसेच पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
7/10

येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रीय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
8/10

काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
9/10

पंचमहाभूतांचे संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
10/10

दरम्यान श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम, सेंद्रीय शेती, पंचमहाभूत तत्वांची माहिती देणारी दालने, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आदींबाबत माहिती दिली.
Published at : 24 Feb 2023 08:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























