एक्स्प्लोर

वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया

भारताच्या शेजारील शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या आघाडी दैनिक ‘डॉन’ने वाजपेयींच्या निधनाचं वृत्त छापलं आहे.

मुंबई: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत आज मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयींच्या निधनाने जगभरातील नेत्यांनीही श्रद्धांजली व्यक्त केली. भारताच्या शेजारील शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या आघाडी दैनिक ‘डॉन’ने वाजपेयींच्या निधनाचं वृत्त छापलं आहे. “भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा गुरुवारी वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू, नरेंद्र मोदींकडून ट्विटरवर दुजोरा” या मथळ्याखाली डॉन दैनिकाने वेबसाईटवर वृत्त छापलं आहे. वाजपेयींची पार्श्वभूमी देताना डॉन दैनिकाने 1998 मधील पोखरण अणू चाचणीचा उल्लेख केला आहे. वाजपेयींनी 1998 मधील पोखरण अणूचाचणीमुळे पाकिस्तानसोबत आण्विक युद्धाची स्थिती निर्माण केली होती. मात्र नंतर त्यांनी इस्लामाबाद शांतता करार केला, असं डॉनने म्हटलं आहे. वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले हिंदुत्ववादी होते. वाजपेयी कुशल राजकारणी म्हणून कार्यकर्त्यांमध्ये परिचीत होते, असं डॉनने नमूद केलं. वाजपेयी आणि त्यांच्या पक्षाने देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, अशी त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे भारतात दुर्मिळ आहे, असं डॉनने म्हटलं आहे. पोखरण चाचणी 11 मे 1998 रोजी तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने राजस्थानातील पोखरणमध्ये अणू चाचणी केली होती. या चाचणीमुळे अख्खं जग हैराण झालं होतं. अचानाक झालेल्या या चाचणीमुळे अमेरिका, पाकिस्तानसह संपूर्ण जगाला धक्का बसला होता. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वात हे मिशन फते केलं होतं. तेव्हा कलाम राष्ट्रपती नव्हते. अमेरिकेलाच काय, संपूर्ण जगाला याचा पत्ता लागला नव्हता. या संपूर्ण मिशनवर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA लक्ष ठेवून होती. मात्र कोणालाही शास्त्रज्ञांचा पत्ता लागू नये, म्हणून त्यांना आर्मीच्या वर्दीत पोखरणला नेण्यात आलं होतं. अब्दुल कलामही आर्मीच्या वर्दीतच तिथे उपस्थित होते. कारगिल युद्ध कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी कारगिल युद्ध पुकारलं होतं. जवळपास अडीच महिने चाललेल्या या युद्धात भारताने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये तिरंगा फडकवला. जवळपास 18 हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धात भारताचे जवळपास 527 जवान शहीद झाले तर 1300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते. या युद्धावेळी भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जवानांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं होतं. या युद्धाच्या निमित्ताने वाजपेयींच्या कूटनितीचा प्रत्यय जगाला आला होता. युद्धादरम्यान वाजपेयींनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही खडे बोल सुनावले होते. एकीकडे तुम्ही मला लाहोरला बोलावून स्वागत करता आणि दुसरीकडे युद्ध छेडता, हे खूपच वाईट आहे, असं वाजपेयी म्हणाले होते. जोपर्यंत पाकिस्तान कारगिल सोडत नाहीत, तोपर्यंत बातचीत होणार नाही. त्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत, असंही वाजपेयी म्हणाले होते. 14 जुलै 1999 रोजी ऑपरेशन विजयची घोषणा केली होती. तर 26 जुलै 1999 हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते. वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं. संबंधित बातम्या मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन  

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी   वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी  हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार   मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
Embed widget