एक्स्प्लोर

Nagpur : धरणे 100 टक्के भरली नसतानाही सोडले जाते पाणी, पावसाळा संपताना धरणामध्ये किती साठा ठेवावा याचेही केले जाते नियोजन

नागपूर जिल्ह्यामध्ये 5 मोठे, 12 मध्यम  व 60 लघु प्रकल्प मिळून 77 प्रकल्प आहेत. धरणे, तलावांचे रक्षण हे केवळ एका विभागाची किंवा प्रशासनाची ही जबाबदारी नाही. ही सामाजिक जबाबदारी आहे.

नागपूर : दरवर्षी पावसाळा संपताना धरणामध्ये किती साठा ठेवावा याबाबतचे नियोजन केले जात असते. काही धरणे 100 टक्के भरली नसताना देखील पाणी सोडल्या जाते. कारण नंतर पाणी किती येईल याचा अंदाज नसतो. खूप वर्षाच्या अभ्यासानंतर कोणत्या महिन्यात किती साठा ठेवावा याचे एक तंत्र विकसित होते. त्यानुसार धरणामधील क्षमता निश्चित केली जात असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी केले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने व महाआयटीच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित वेबवार्ता चर्चेत ते बोलत होते. 'नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन' या विषयावर त्यांनी आज निवेदन केले.

आमची धरणे, बॅरेजेस, तलाव, हे आमचे जीवनदायी वैभव आहे. त्यांचे रक्षण हे केवळ एका विभागाची किंवा प्रशासनाची ही जबाबदारी नाही. ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे जलसाठ्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि संनियंत्रणासाठी प्रशासनासोबत सर्वांनीच जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी आर.विमला यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन हटवार ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये 5 मोठे, 12 मध्यम  व 60 लघु प्रकल्प मिळून 77 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. नैसर्गिक साठ्यांची देखील उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या साठ्याचे संरक्षण करणे, त्यासाठी संरक्षण भिंती उभारणे, कुंपण उभारणे व अन्य उपाययोजना करणे प्रत्येकवेळी शक्य होणार नाही. हे पाणीसाठे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला होणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नागपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या साठ्यांबाबत निर्णय घेताना नागपूरकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या पाणी ग्रहण क्षेत्रात पडणारा पाऊस याबाबत आंतरराज्य संपर्क ठेवला जातो. ठराविक अंतरानंतर सरिता मोजणी केंद्र असतात. त्या मार्फत पाणीसाठ्याच्या संदर्भात अभ्यास केला जातो. ज्या ठिकाणी गेट नसेल त्या ठिकाणी सांडव्यावरून पाणी किती गेले याबाबतची मोजणी करण्याचे तंत्र देखील असते असेही त्यांनी सांगितले.

रेड, ऑरेंज, येलो अलर्ट म्हणजे...

यावेळी त्यांनी पर्जन्यमान अलर्ट व त्याची मोजणी याबाबतचे विश्लेषण केले. रेड अलर्ट म्हणजे 20 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस, ऑरेंज अलर्ट म्हणजे सहा ते वीस सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस, आणि येलो अलर्ट म्हणजे सहा सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी श्रोत्यांना सांगितले. नागपूर जिल्ह्यातील 71 प्रकल्प दरवाजे नसणारे आहे. सांडव्यावरून पाणी भरणे आहे.सध्या 100 टक्के पाणी सर्वच प्रकल्पात भरलेले नाही ,असे त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटने संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली. पाण्याशी कोणी खेळू नये. ती फार मोठी शक्ती असते त्यामुळे पुलावरून पाणी थोडे जरी जात असले तरी त्याच्या प्रवाहातली ताकद लक्षात येत नाही त्यामुळे वाहत्या पाण्यामध्ये हाराकिरी करून आपला जीव गमावणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी येणारे संदेश जागरूकपणे समजून घेणे आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये परवानगी नसेल तर कोणत्या जलसाठ्याच्या भागात प्रवेश करू नये सेल्फीच्या नादात आपला जीव गमावू नये असा संदेशही त्यांनी शेवटी आपल्या निवेदनात दिला. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: महाराष्ट्र दिनी चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्यालाही मोठी झळाळी, पाहा आजचे ताजे दर
महाराष्ट्र दिनी चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्यालाही मोठी झळाळी, पाहा आजचे ताजे दर
Pune Crime News: पुण्यातील कोंढव्याला म्हटले 'पाकिस्तानचे कराची'; भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोंढव्याला म्हटले 'पाकिस्तानचे कराची'; भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Amit Shah On Mumbai Drugs Case: मोठी बातमी: मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप...
मोठी बातमी: मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप...
Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी
Maharashtra News Live Updates: तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा परिणाम; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
Sunetra Pawar Beed: अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
MIM Corporator : सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
Aaple Sarkar Portal Down: 'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
Embed widget