एक्स्प्लोर

Gandhi: गांधी संस्थांमधील वाद चव्हाट्यावर, सर्व सेवा संघात दोन तर सेवाग्राम आश्रमातही दोन गांधीवाद्यांचा अध्यक्षपदावर दावा

Sevagram: गांधीवादी गटा तटातील  वाद संपवण्यासाठीव विद्रोही गटाचे आबा कांबळे यांनी उपोषण केलं होतं, पण दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने ते मागे घेण्यात आलं आहे. 

वर्धा : महात्मा गांधी यांच्या व्यापक दूरदृष्टीतून आणि सर्वोदय विचारांतून साकार झालेल्या सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम तसेच अतर गांधीवादी संस्थांमध्ये गटातटांचं राजकारण सुरू झालंय. सर्व सेवा संघात दोन गटांचे दोन अध्यक्ष, तर सेवाग्राम आश्रमातही दोन अध्यक्ष अशी स्थिती सध्या निर्माण झालीय. दरम्यान गांधीवादी कार्यकर्ते मात्र हे गटतट थांबवण्याचे आणि वाद संपवण्याचा प्रयत्न करतायत.

महात्मा गांधी यांच्या सर्वोदयी विचारांनी प्रेरित होत ग्रामस्वराज्य स्थापनेसाठी सर्वोदय संघ स्थापन झाला होता. पण या सर्वोदय संघात अलीकडे भूदान घोटाळे समोर आले. लोकसेवक राजकीय नेत्यांच्या रांगेत बसायला लागले आहे. त्यातूनच गट निर्माण होऊन चंदन पाल आणि महादेव विद्रोही यांच्यात गटबाजी सुरू आहे. आता ही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गांधीवाद्यामधील हा विवाद मिटला पाहिजे. सुसंवादाचा पूल बांधला गेला पाहिजे. यासाठी आबा कांबळे हे उपोषणावर बसले. अखेर दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका समोर आल्याने त्यांनी उपोषणाची सांगता केली आहे. पण हा वाद कशासाठी हा प्रश्न अजूनही कायम आहे. 

गेल्या काही वर्षात सर्व सेवा संघाचे तत्कालीन अध्यक्ष महादेव विद्रोही यांचा कार्यकाळ संपल्यावर अध्यक्ष पदाचा वाद निर्माण झाला होता. पुढे एका गटाने चंदन पाल यांना अध्यक्ष बनवले तर दुसऱ्या गटाने अरविंद रेड्डी यांना अध्यक्ष बनवले. ही गटबाजी गांधी विचारांना अभिप्रेत नाही. त्यामुळे हा वाद मिटवून गांधीवादी एकत्र आले पाहिजे. पोचमपल्ली येथे सर्व सेवा संघाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात चंदन पाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले होते. पण ते पोहचले नाही. टी. आर. एन. प्रभू यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. 

हा वाद नेमका कोण वाढवतंय माहिती नाही, आम्हालाही वाटते हा वाद मिटला पाहिजे. पण काही लोकांना हा वाद मिटायला पाहिजे असे वाटत नाही. त्यामुळे हा वाद वाढत आहे असं विद्रोही गटाचे आबा कांबेळ म्हणाले. 

गांधीवादी संस्थामध्ये वाढणारा वाद पाहता आबा कांबळे यांनी उपोषण सुरू केले होते, हे उपोषण अखेर सोडवण्यात आले आहे, सामंजस्य निर्माण होण्यासाठी तडजोड करण्यात आली आहे. दोन्ही गटातील पाच- पाच सदस्य पुढील काही दिवसात एकत्र येतील चर्चा करतील आणि हा वाद सुटेल अशी अपेक्षा आहे. 

महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आणि हाच संदेश जगात पोहचवण्याचा ध्यास असणाऱ्या गांधीवाद्यांमध्ये दुही निर्माण झाली. आता हे कधी थांबणार ते पाहणे महत्वाचे आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget