एक्स्प्लोर

Facts: येत्या काही वर्षांत एक अब्ज लोकांचा होणार मृत्यू; यामागे आहे 'हे' आश्चर्यकारक कारण

वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाने नुकतंच हवामान बदलावर संशोधन केलं आहे. यातून मानवासाठी धोकादायक असलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत.

Facts: येणारा काळ मानवासाठी खूप कठीण असणार आहे. कोरोनानंतर (Corona) आता हवामान बदल (Climate Change) एवढा विध्वंस घडवून आणणार आहे की, येत्या काळात एक-दोन नव्हे तर तब्बल एक अब्ज लोक मृत्यूला बळी पडणार आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, पृथ्वीचा एखादा ठराविक भाग यामुळे बाधित होणार नाही, तर जगातील प्रत्येक कोपऱ्यातील माणसाचा या विनाशात समावेश असणार आहे. याबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात? हे जाणून घेऊयात सविस्तर... 

शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?

वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाने नुकतंच हवामान बदलावर संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांनी वाढलेलं तापमान (Rising Temperature) भविष्यात मानवासाठी कसा मृत्यूचा विषय बनणार आहे हे सांगितलं आहे. या संशोधनाचे प्रमुख जोशुआ पियर्स यांच्या म्हणण्याप्रमाणे, मृत्यूची ही आकडेवारी येणाऱ्या पिढीसाठी भीतीदायक असणार आहे. मात्र, एक अब्ज लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारी ते म्हणाले की, कदाचित इतके लोक मरणार नाहीत, पण हे आकडे जवळपास इतके असू शकतात की, ज्यामुळे मानवाचा विध्वंस नक्कीच होईल.

माणसाने विध्वंसापासून वाचण्यासाठी काय करावं?

ही आपत्ती टाळण्यासाठी मानवाने प्रथम हवामान बदलाकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच कार्बन उत्सर्जनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावं लागणार आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, विविध संस्था नागरिकांना विविध गोष्टींतून होणारं कार्बन उत्सर्जन ताबडतोब रोखण्याचं आवाहन करत आहेत. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, पृथ्वीचं तापमान ज्या प्रकारे दरवर्षी वाढत आहे, त्यामुळे येत्या वर्षभरात हे जग आगीची भट्टी बनणार आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मानवाने शक्य तितक्या लवकर मानवी जीवनासाठी घातक इंधनांचा वापर करणं थांबवावं. जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर देखील थांबवावा. खरं तर, जीवाश्म इंधन हे हवामान बदलासाठी सर्वात मोठं योगदान आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, सरकारने कार्बन कचरा व्यवस्थापन (Carbon Waste Management) आणि कार्बन डायऑक्साईड (Carbo dioxide) नैसर्गिकरित्या साठवण्यासाठी एखादं तंत्रज्ञान विकसित केलं तर ते हवामान बदलासाठी चांगलं ठरेल.

जगबुडीची देखील उद्भवू शकते समस्या

पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असणारं ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. या बेटाचा बराचसा भाग बर्फाने झाकलेला आहे. पण, गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधील बर्फ वेगाने वितळत आहेत. असंच सुरू राहिल्यास सखल भागातील मानवी वसाहतींचं अस्तित्व लवकरच धोक्यात येईल. जागतिक तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहेत. यासोबतच कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Waming) ध्रुवीय प्रदेशात हिमनद्यांचा बर्फ वितळत आहे. पृथ्वीवरील बर्फ वितळल्यास जगबुडी होण्याचा धोका आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

New Virus: मानवाने हे काय केलं? लाखो वर्षांपूर्वीचा व्हायरस पुन्हा होणार जिवंत; पृथ्वीचा होणार विनाश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget