Buddhist Conference Thane : जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा : एकनाथ शिंदे
Eknath Shine Thane Speech : सम्राट अशोक जयंतीनिमित्त ठाण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद पार पडली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्धांच्या विचारांचा जागतिक शांततेसाठी महत्त्व अधोरेखित केला.

ठाणे : या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधोरेखित केलं. कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणण्याचं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाण्यातील आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये ते बोलत होते.
सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. या परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) आणि महापौर शर्मिला पिंपळोकर (Sharmila Pimpalolkar) उपस्थित होते. जगभरातून बौद्ध धम्माचा प्रसार करणारे भन्ते या परिषदेसाठी ठाण्यात दाखल झाले होते.
Honor Ceremony : 'बौद्ध रत्न’ देऊन शिंदेंचे सन्मान
या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिक्खू संघाकडून ‘बौद्ध रत्न’ देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कामाचा गौरव करत सन्मानचिन्ह देण्यात आलं. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतही त्यांना देण्यात आली. यावेळी भिक्खू समाजाकडून एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देण्यात आला. भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या. तसंच त्यांना बौद्ध प्रतिमाही भेट देण्यात आली.
Eknath Shinde Speech : जगाला बुद्धाची गरज
एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील लोकांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं. भिक्खूंच्या उपस्थितीमुळे ठाण्याची भूमी पावन झाली. जगात शांतता हवी असेल तर बुद्धांचे विचार आवश्यक आहेत. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज आहे. बुद्धांना केवळ मूर्तीत नाही तर विचारात शोधा आणि कर्मकांडात अडकू नका.
संघदान ही केवळ कृती नसून बुद्धांप्रती समर्पणाची भावना असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले, 'ना तलवार की धार से, ना गोली की बौछार से… दुनिया बदलेगी बुद्ध के विचार से' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde On Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांबाबत वक्तव्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, असं सांगत त्यांनी त्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात ‘वर्षा’ निवासस्थानी पहिल्यांदाच धम्म वचन म्हटलं गेलं, याचाही त्यांनी उल्लेख केला.
ही बातमी वाचा:
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















