एक्स्प्लोर

आता केवळ 3 दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट

आता केवळ 3 दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट करता येणार आहे, या संदर्भात ट्रायने नवीन नियमावली जारी केली आहे. सुधारित नियमानुसार जर ऑपरेटरने पोर्टिंग अर्ज नाकारला तर त्यासाठी दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई : आता मोबाईल नंबर पोर्ट करणे अधिक सोपं होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(TRAI)मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीसाठी नवीन नियमावली सादर केली आहे. यानुसार, आता केवळ 3 दिवसांच्या आत ग्राहक नंबर पोर्ट करु शकणार आहेत. तर एका सर्कलवरुन दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करायचा असल्यास 5 दिवसांचा अवधी लागणार आहे. मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीचे हे नवीन नियम 16 डिसेंबरपासून लागू होतील. नंबर पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला. मात्र, नंबर पोर्ट करण्याची ही प्रक्रिया वाटती तितकी सोपी नाही. अनेकवेळा कारण नसताना मोबाईल कंपन्या ग्राहकांना नंबर पोर्ट करु देत नाहीत. याच संदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर ट्रायने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने अर्ज नाकारल्यास 10 हजारांचा दंड - सुधारित नियमानुसार जर ऑपरेटरने चुकून पोर्टिंग अर्ज नाकारला तर त्याला 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. नवीन सुधारित नियमांनुसार सर्वात मोठा बदल यूनिक पोर्टिंग कोड (यूपीसी)शी संबंधित आहे. त्यानुसार आता टेलिकॉम ऑपरेटरला यूपीसीचा अर्ज मिळेल आणि तो त्वरित संबंधित एमएनपीएसपीकडे पाठविला जाईल. एमएनपीएसपी, डोनर ऑपरेटरच्या डेटाबेसद्वारे तपासणी करुन यूपीसी जनरेट करेल आणि नंतर तो ग्राहकांना पाठवेल. त्यामुळं ही प्रक्रिया केवळ 3 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ लागतो. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे काय? मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ही एक सुविधा आहे ज्यात ग्राहकांचा नंबर न बदलता ऑपरेटर बदलण्याचा पर्याय आहे. यासाठी युजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. हा यूनिक कोडच त्यांना नंबर पोर्ट करण्यास मदत करतो. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सला प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 5.74 रुपये द्यावे लागतील. सध्या कंपन्यांना प्रत्येक ग्राहकांसाठी एजेंसीनी 19 रुपये द्यावे लागतात. सुधारित नियमांतर्गत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सर्व्हिस (एमएनपीएसपी)ग्राहकांच्या सुविधेसाठी अनोखा पोर्टिंग कोड तयार करावा लागणार आहे. तर पूर्वी हा नियम दूरसंचार ऑपरेटरला लागू होता. युनिक पोर्टिंग कोड (यूपीसी)हा आठ अंकी अल्फा संख्यात्मक कोड आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रायने हा सुधारित नियम लागू केला होता. जो जून 2019 मध्येच लागू होणार होता. मात्र, मोबाईल कंपन्यांनी या नियमांना न्यायालयात आव्हान दिल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता. संबंधित बातम्या - 5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचे कर्ज; शाओमी कंपनीची ऑफर आयडिया-व्होडोफोनच्या ग्राहकांना बसणार झटका; 3 डिसेंबरपासून नवीन दरवाढ मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीबाबत ग्राहकांना काय वाटतं? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...
विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांचा प्रभाव? नास्तिक होण्याचा प्रवास सांगत म्हणाले...
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
Embed widget