एक्स्प्लोर

Google Doodle, Anna Mani : भारताच्या ‘वेदर वुमन’ अ‍ॅना मणी यांची 104वी जयंती, गुगलकडून खास डूडल!

Anna Mani : आज 23 ऑगस्ट 2022, भारताच्या ‘वेदर वुमन’ (Weather Woman Of India) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅना मणी (Anna Mani) यांची 104वी जयंती आहे.

Anna Mani : आज 23 ऑगस्ट 2022, भारताच्या ‘वेदर वुमन’ (Weather Woman Of India) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅना मणी (Anna Mani) यांची 104वी जयंती आहे. याच दिवसाचं निमित्त साधून सर्च इंजिन गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी अ‍ॅना मणी यांना मानवंदना दिली आहे. हवामान निरीक्षण यंत्रांच्या रचनेत अ‍ॅना मणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बनवलेली हवामान निरीक्षण यंत्र भारतातील हवामानाच्या पैलूंचे मोजमाप करण्यात आणि अंदाज व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अ‍ॅना मणी यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी केरळ राज्यातील पीरुमेडू येथे झाला. भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अ‍ॅना मणी यांना ‘भारताच्या वेदर वुमन’ म्हणूनही ओळखले जाते. मणी यांच्या संशोधनामुळेच आजघडीला भारतातील हवामानाचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. अ‍ॅना मणी यांच्या हवामानशास्त्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी गुगलने त्यांच्या 104व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष डूडल समर्पित केले आहे.

अ‍ॅना मणी यांची ओळख

अ‍ॅना मणी या भारतातील आघाडीच्या महिला वैज्ञानिकांपैकी एक होत्या. त्यांनी भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक पदाची धुरा संभाळली होती. सौर किरणोत्सर्ग, ओझोन आणि पवन ऊर्जा उपकरणे या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अ‍ॅना मणी यांनी आपल्या कामाची सुरुवात भारतीय हवामान खात्यात लिपिक म्हणून केली होती. त्यांचा हा प्रवास मेहनतीच्या जोरावर उपमहासंचालक पदापर्यंत पोहोचला. जगात जेव्हा पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात फारसे संशोधन होत नव्हते, तेव्हा मणी यांनी भारतात सौर आणि पवन ऊर्जेवर काम केले.

सुरुवातीला त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते. पण, हळूहळू भौतिकशास्त्रात त्यांना जास्त रुची वाटू लागली. यामुळेच त्यांनी चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी (ऑनर्स) मिळवली. त्यानंतर त्यांना बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. इथे त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सर सीव्ही रामन यांच्या मार्गदर्शनाखाली हिरे आणि माणिक यांच्या ऑप्टिकल गुणधर्मांवर संशोधन केले. मात्र, भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी नसल्याने त्यांना पीएचडी नाकारण्यात आली.

हवामान क्षेत्रात मोठं योगदान

रमण यांच्या प्रयोगशाळेत तीन वर्षे काम केल्यानंतर त्या भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांना हवामान यंत्रांच्या विकासासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांचा अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर त्या पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागात हवामानशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. इथेच त्यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांचे डिझाईन बनवण्यास सुरुवात केली. हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी देशभर निरीक्षण केंद्रेही स्थापन केली.

मणी यांनी 1960मध्ये वातावरणातील ओझोन मोजण्याचे काम सुरू केले. वातावरणातील ओझोन मोजण्यासाठी ‘ओझोनसोंड’ हे उपकरण तयार केले. मणी यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय ओझोन आयोगाचे सदस्य बनवण्यात आले. 1976 मध्ये त्या भारतीय हवामान खात्याच्या उपमहासंचालक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी 'द हँडबुक फॉर सोलर रेडिएशन डेटा फॉर इंडिया'  आणि 'सोलर रेडिएशन ओव्हर इंडिया' ही दोन पुस्तके देखील लिहिली. 1994 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्या सतत आजारी होत्या. 16 ऑगस्ट 2001 रोजी तिरुवनंतपुरम येथे त्यांचे निधन झाले.

हेही वाचा :

Google कडून भारताचा स्वातंत्रोत्सव साजरा, भारताची संस्कृती दाखवत बनवले खास Doodle!

Balamani Amma : बालमणी अम्मा यांची 113वी जयंती; गुगलकडून खास डूडल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget