एक्स्प्लोर

Manoj Jarange : 'इतक्या ताकदीनं लढा, आरक्षण पदरात पडलं पाहिजे', मनोज जरांगे पाटलांचा मराठा बांधवाना सल्ला 

Solapur Manoj Jarange : 'हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे', असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

सोलापूर : "आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

मनोज जरांगे पाटील हे आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौऱ्यावर असून आज या ठिकाणी मराठा बांधवांची भव्य सभा होत होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना सूचक सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले, "आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान दिले असून काकासाहेब शिंदेपासून आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्यासाठी त्यांच्या बायकोच्या कपाळावरच कुंकू पुसलं याची आठवण आपल्याला ठेवायला लागणार आहे. एवढा मोठा समाज असताना त्यांच्यावर मायचं छत्र आपल्याला धराव लागणार आहे. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे"

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही: मनोज जरांगे

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आपल्या जातीवर अन्याय होतो आहे, म्हणून आपण एकजुट झालो. त्यामुळे असच आपण एकजुटीने सोबत राहील पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे. शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला. आजपर्यंत सुरु आहे. मात्र सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात, आता त्यांचाच नंबर आहे. आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सु्ट्टीच नाही. 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिल आहे. त्यांची मुलं उन्हात पडली आहेत, त्यांच्यावर मायेचं छत्र ठेवावं लागणार आहे. हा पहिला आणि शेवटचा लढा समजून आरक्षण मिळालच पाहिजे, इतक्या ताकदीने लढा लढायचा आहे. म्हणुन आरक्षणासाठी मराठा समाजाला मागास सिद्ध असणं गरजेचं आहे. गायकवाड समितीने 12- 13 टक्के आरक्षण दिल जाऊ शकत, असं म्हटलं आहे. आणि एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो. विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळतय, म्हणून आपल्यालाही ते हवं आहे, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. 

मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही.... 

मराठा समाजातील काही नेते विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकजण माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या समाजाचं लेकरु असून मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही. यांनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र खुळखुळा वाजवणारा दिसतो, म्हणून त्यांनी हलक्यात घेतलं. पण आपण साधे नाही आहोत, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, आम्ही निकष पार केले तरी आरक्षण मिळालेलं नाही. मराठा ही देशभरात एकमेव मागास सिद्ध झालेली जात आहे. मंडल कमिशनला ओबीसींची जनगणना करा सांगण्यात आलं. मंडल कमिशनने मात्र नव्याने जनगणना केली नाही. इंग्रजांची आकडेवारी घेतली आणि ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिले. मग 4 वर्षात ते 30 टक्के झालं, या चार वर्षांत 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली, हे लक्षात घेतले पाहिजे. 40 वर्ष एकमेकांशी पटत नसलेले एका रात्रीत एकत्र आले. मग आपण का नाही, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला.

इतर महत्वाची बातमी : 

Ramdas Athawale : मनोज जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये - रामदास आठवले

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget