एक्स्प्लोर

Sangli Crime : उत्तर प्रदेशात तीन गलाई व्यावसायिकांचा 16 कोटींच्या सोन्यावर डल्ला, पण थरकाप उडाला सांगलीत; एसआयटीकडून पलूस, खानापुरात कसून तपास

Sangli Crime : आरोपी देश सोडून पळून जाऊन नये, यासाठी त्यांची छायाचित्रे मुंबई आणि लखनौ विमानतळावर देण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही आरोपींविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सांगली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून सांगली जिल्ह्यातील तीन गलाई व्यवसायिक सोनं 16 कोटींचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कानपूर पोलिसांचे विशेष पथक सांगली जिल्ह्यात तळ  ठोकून आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेनंतर गलाई व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तब्बल साडेतीन किलो सोनं घेऊन फरार झालेल्या गुन्ह्यामध्ये संपतराव लवटे, महेश मस्के आणि एक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी कानपूर पोलिसांसह (Kanpur Police) सांगली पोलिस सुद्धा करत आहेत. दरम्यान, आणखी एक उत्तर प्रदेश पोलिसांची टीम दाखल झाली आहे. दोन संशयित तरुणांच्या गावाकडील कुटूंबाची कसून चौकशी सुरु आहे. 

खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी 

दरम्यान हे तिघेजण देश सोडून पळून जाऊन नये, यासाठी त्यांची छायाचित्रे मुंबई आणि लखनौ विमानतळावर देण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही आरोपींविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कानपूर पोलिसांचे विशेष पथक खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी करत आहे.  दरम्यान कानपूरसारख्या घटनांमुळे गलाई व्यावसायिकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात विटामधील नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक आणि अध्यक्ष सतीश साळुंखे, स्थानिक अध्यक्ष गणपतराव बुडाले आणि उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल 16 कोटींचे दागिने चोरीला गेल्याने सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. 

कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल

सांगली जिल्ह्यातील पलूस आणि खानापूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल झालं आहे. या पथकात तब्बल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांचा समावेश आहे. या पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. दुसरीकडे पोलिस सहायुक्तांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी नेतृत्व एसीपी सीमा माऊवेता कुमार करत आहेत. 

साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन तिघेही पसार

दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बेकनगंज सरापी बाजारात संपतराव लवटे हा गलाई व्यवसायिक आहे. जुन्या सोन्याची दागिने वितळवण्यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून बेकनगंज आणि परिसरातील सर्व व्यावसायिक आपलं सोनं संपतराव शिवाजी लवटेला देतात. लवटेसह अन्य महेश विलास मस्के आणि अन्य व्यक्ती सोनं गाळणीचे काम करतात. 

शुक्रवारी 1 डिसेंबर पासून त्यांच्याकडे गाळणीसाठी आलेलं साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन हे तिघेही पसार झाले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर कानपूरपासून ते पार सांगलीपर्यंत हा तपास सुरु आहे. संपतराव लवटे याचं कुटुंबं कानपुरात बिरहाण रोड येथील नीलवल्ली गल्लीत भाड्याच्या घरात राहत होतं. त्याचं बेकनगंजमध्ये एस आर गोल्ड टेस्टिंग नावाचे दुकान आहे.  हे दोघेही सध्या फरार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विश्वजीत कदमांनी हात जोडले, मिश्किल हास्य करत म्हणाले; गोपीचंद पडळकर महान नेते, 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे
विश्वजीत कदमांनी हात जोडले, मिश्किल हास्य करत म्हणाले; गोपीचंद पडळकर महान नेते, 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे
Shaktipeeth Highway : भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, फक्त एका 'देवा'लाच शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांचा फडणवीसांवर बोचरा वार
भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, फक्त एका 'देवा'लाच शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांचा फडणवीसांवर बोचरा वार
El Nino Effect: राज्यावर एल निनोच्या संकटांचे ढग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाच्या सूचना, अवकाळीनेही पुन्हा झोडपलं,अस्मानी संकटानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
राज्यावर एल निनोच्या संकटांचे ढग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाच्या सूचना, अवकाळी पावसानेही पुन्हा झोडपलं,अस्मानी संकटानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली

व्हिडीओ

Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
Embed widget