एक्स्प्लोर

Jayant Patil : काळ बदलला न्याय बदलला, पक्ष पळवणे हा दिवसा ढवळ्या घातलेला दरोडाच, जयंत पाटलांचा निशाणा 

Jayant Patil : पक्ष पळवणे हा दिवसा दिवसा-ढवळ्या घातलेला दरोडाच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

Jayant Patil on Maharashtra Politicis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आठ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, तरीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळं सुप्रीम कोर्टही पक्षच शिंदेंचा असल्यानं निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं म्हणू शकते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील   (NCP Jayant Patil) यांनी दिली. पक्ष पळवणे हा तर दिवसा दिवसा-ढवळ्या घातलेला दरोडाच असल्याचे पाटील म्हणाले. 

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध वॉर्डातील विकासकामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. काळ बदलला आहे. न्याय बदलला आहे. जे न्याय देतील अशी अपेक्षा असते तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे लोकं म्हणत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. एक पक्षच पळवण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरु असल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केला. आता न्याय जनतेच्या न्यायालयातच जाऊन करावा लागेल. इंदिरा गांधी यांचा याच जनतेने पराभव केला आणि याच जनतेने त्यांना डोक्यावर बसवले असेही जयंत पाटील म्हणाले. 

फैसला जनतेच्या न्यायालयात जाऊनच करावा लागेल

देशात कायदा आहे की नाही याची शंका आता लोकांच्या मनात येत आहे. जे न्याय देणारे आहेत, तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे जयंत पाटील म्हणाले.  आठ लाख कागदपत्र उद्धव ठाकरेंनी देऊनही निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजून दिला आहे. निकाल देताना आमदारांच्या संख्येचा विचार केल्याचे जयंत पाटील म्हणाले. निकालाचेही काम पूर्ण झाले नाही. पण आम्हाला कोणीतरी सांगत आहे म्हणून लवकर निर्णय केल्याचे जयंत पाटील म्हणाले. न्याय आहे किंवा नाही याचा फैसला जनतेच्या न्यायालयात जाऊनच करावा लागेल असे जयंत पाटील म्हणाले. 

कमळाकडे लांबून पाहावं, जवळ घेऊ नये 

देशातील जनता फार हुशार आहे. देशात जे चालले आहे ते बरोबर नाही. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत सत्ताधारी काही बोलत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. देशातील सरकारला जेव्हा अपयश येत तेव्हा धर्माचा आधार घेतला जातो. त्यामाध्यमातून टोकाच्या भावना निर्माण केल्या जातात. लोकांना संघटीत करायचे त्यामुळं लोक बाकीचं सगळं लोक विसरुन जातात असे जयंत पाटील म्हणाले. सगळ्याच क्षेत्रात सामान्य माणसाला पिडण्याचे काम होत असेल तर नागरिकांनी सावध होण्याचे काम केलं पाहिजे. ज्या फुलातून वास येतो त्याला फूल म्हटलं पाहिजे. कमळाकडे लांबून पाहावं. दिसायला चांगले असले तरी जवळून घेऊन वास घेऊ नये असे जयंत पाटील म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं गाडीच्या टपावरून भाषण, नेटकऱ्यांना आठवली बाळासाहेबांची सभा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Embed widget