एक्स्प्लोर

गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं आणि आज अखेर त्यानं आपले प्राण सोडलेत.

Ratnagiri News: रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल (Blue Whale) माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. 

खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं. अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण फक्त प्रयत्न नाहीतर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती. बेबी व्हेलला अथांग समुद्रातील त्याच्या घरच्या वाटेपर्यंत सोडण्यासाठी अनेक अडथळे येत होते. माशाला समुद्रात सोडण्यासाठीचे स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न आणि जगण्यासाठीची माशाची धडपड तब्बल 40 तास सुरू होती. अखेर 40 तासांनंतर अखेर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण काय झालं, कुणालाच नाही कळलं आणि पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आला आणि अखेर त्यानं मृत्यूसमोर हात टेकत आपला जीव सोडला. 


गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

प्रशासनाकडून बेबी व्हेलला वाचवण्याचे अथक प्रयत्न अयशस्वी 

व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ  यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू  शकतात.  त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात.  त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या  थरामुळे  शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात. अशावेळी गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडलेल्या व्हेलच्या पिल्लाला महत्वाचा धोका होता. त्याच्या त्वचेखालील चरबीच्या थराचं तापमान पाण्याबाहेर प्रचंड वाढून, त्वचा सुकून जाण्याचा. यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही खूप वाढतं आणि डिहायड्रेशन होऊन माशाचा मृत होण्याचा धोका अधिक होता. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्यानं हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला. 

बेबी व्हेल जन्मापासून तीन महिने आईच्या दुधावर जगतो

साधारणपणे तीन वर्ष व्हेल माशाचं पिल्लू आईच्या दुधावर वाढतं. समुद्रात परत सोडल्यावरही त्याला त्याची आई भेटणं महत्वाचं होतं. बेबी व्हेल जन्माला आल्यानंतर लगेच दूध पिण्यास सुरुवात करतं. बेबी व्हेलमधील natural instinct आणि गंध ज्ञान यामुळे, आपल्या आईला दुधाची भूक लागल्यावर कुठे स्पर्श करायचा याचं त्यांना उपजतच ज्ञान असतं. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवतं आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारलं जातं. हे पाण्यामध्ये फवारलं गेलेलं दूध पिल्लू पितं, अशी माहिती तज्ज्ञांनी ABP माझाला दिली आहे. 

पाहा व्हिडीओ : Whale Fish Ganpatipule : गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू : ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लोटे MIDC तील डॉक्टर खान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 कर्मचारी  जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर 
लोटे MIDC तील डॉक्टर खान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 कर्मचारी  जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
PSI मनीष कांबळेला 25 हजारांची लाच घेताना अटक, अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच
PSI मनीष कांबळेला 25 हजारांची लाच घेताना अटक, अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच
उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 
उदय सामंत पोटात शिरणारा शुक्राचार्य, खोटं कसं बोलाव हे त्यांच्याकडूनच शिकावं, भास्कर जाधवांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget