एक्स्प्लोर

Sharad Pawar: ती एक गोष्ट घडल्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडतील, याचा अंदाज आला होता: शरद पवार

Sharad Pawar: राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर कसा करतात, याचे उत्तम उदाहरण चंदीगड महापौरपदाची निवडणूक आहे. यावरुन स्पष्ट होतं की, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने विरोधकांना बाजूला करण्याचे काम करत आहेत.

कोल्हापूर: अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडणं, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. परंतु, मला या गोष्टीचं तितकंस आश्चर्य वाटत नाही. भाजपने गेल्या १० वर्षातील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. तेव्हाच आम्हाला वाटलं की, ही अशोक चव्हाण यांना एकप्रकारे दिलेली धमकी आहे. तेव्हाच या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील, असे वाटले होते. अखेर ते झालंच, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे जागावाटप, चंडीगड महापौरपदाची निवडणूक, राहुल गांधींची पदयात्रा अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. इंडिया आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेबाबत पवारांनी सविस्तरपणे भाष्य केले. इंडिया आघाडीती पक्षांनी एकत्रित काम करावे, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात संबंधित पक्षांनी चर्चा करावी. पण काही ठिकाणी जागावाटपावरुन वाद सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या दोन राज्यात जागावाटपावरुन एकमत झालेले नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. अशा समस्या आम्ही अद्याप हाताळलेल्या नाहीत. सध्या जिथे-जिथे शक्य आहे, तिकडे इंडिया आघाडीतील पक्षांनी जागावाटपाची चर्चा संपवावी. त्यानंतर जिथे वाद असतील तिथे इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, असे आमचे धोरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज: शरद पवार

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांनी भाष्य केले. या चर्चेत बहुतांश जागांवर एकमत झाले असून काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र, या जागा कोणत्या, हे मी सांगू शकत नाही. जागावाटपाच्या चर्चेत मी सहभागी नाही. आमच्याकडून जयंत पाटील, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे जागावाटपाची चर्चा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे. आंबेडकरांनी सूचना केली होती की, एकत्र बसणे आवश्यक आहे. उद्या लोकांसमोर आपला सामूदायिक कार्यक्रम काय, याची चर्चा सध्या सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मोदींना लोकसभेतील विजयाची खात्री नाही: शरद पवार

अनेक राज्यात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी केली जात आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हेच पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. त्यांना लोकसभेतील विजयाची खात्री नाही. अनेक सर्वेक्षणं भाजपच्या विरोधात निकाल असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ५० टक्के जागा मिळत आहेत. त्यामुळे भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे आहे. त्यादृष्टीने भाजप पावले टाकत आहे. ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजपचे लोक सांगत असतात की, मोदी है तो मुमकिन है. तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

आणखी वाचा

बारामतीमध्ये अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Maharashtra Budget 2026: डिफेन्स एव्हिएशन सेंटर ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
डिफेन्स एव्हिएशन सेंटर ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget