एक्स्प्लोर

Sharad Pawar: ती एक गोष्ट घडल्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडतील, याचा अंदाज आला होता: शरद पवार

Sharad Pawar: राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर कसा करतात, याचे उत्तम उदाहरण चंदीगड महापौरपदाची निवडणूक आहे. यावरुन स्पष्ट होतं की, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने विरोधकांना बाजूला करण्याचे काम करत आहेत.

कोल्हापूर: अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडणं, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. परंतु, मला या गोष्टीचं तितकंस आश्चर्य वाटत नाही. भाजपने गेल्या १० वर्षातील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. तेव्हाच आम्हाला वाटलं की, ही अशोक चव्हाण यांना एकप्रकारे दिलेली धमकी आहे. तेव्हाच या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील, असे वाटले होते. अखेर ते झालंच, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे जागावाटप, चंडीगड महापौरपदाची निवडणूक, राहुल गांधींची पदयात्रा अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. इंडिया आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेबाबत पवारांनी सविस्तरपणे भाष्य केले. इंडिया आघाडीती पक्षांनी एकत्रित काम करावे, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात संबंधित पक्षांनी चर्चा करावी. पण काही ठिकाणी जागावाटपावरुन वाद सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या दोन राज्यात जागावाटपावरुन एकमत झालेले नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. अशा समस्या आम्ही अद्याप हाताळलेल्या नाहीत. सध्या जिथे-जिथे शक्य आहे, तिकडे इंडिया आघाडीतील पक्षांनी जागावाटपाची चर्चा संपवावी. त्यानंतर जिथे वाद असतील तिथे इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, असे आमचे धोरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज: शरद पवार

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांनी भाष्य केले. या चर्चेत बहुतांश जागांवर एकमत झाले असून काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र, या जागा कोणत्या, हे मी सांगू शकत नाही. जागावाटपाच्या चर्चेत मी सहभागी नाही. आमच्याकडून जयंत पाटील, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे जागावाटपाची चर्चा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे. आंबेडकरांनी सूचना केली होती की, एकत्र बसणे आवश्यक आहे. उद्या लोकांसमोर आपला सामूदायिक कार्यक्रम काय, याची चर्चा सध्या सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मोदींना लोकसभेतील विजयाची खात्री नाही: शरद पवार

अनेक राज्यात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी केली जात आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हेच पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. त्यांना लोकसभेतील विजयाची खात्री नाही. अनेक सर्वेक्षणं भाजपच्या विरोधात निकाल असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ५० टक्के जागा मिळत आहेत. त्यामुळे भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे आहे. त्यादृष्टीने भाजप पावले टाकत आहे. ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजपचे लोक सांगत असतात की, मोदी है तो मुमकिन है. तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

आणखी वाचा

बारामतीमध्ये अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget