एक्स्प्लोर

Sharad Pawar : काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण, त्यांची स्थिती चिंताजनक, दारिद्र रेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखी नाही : शरद पवार

Sharad Pawar, मुंबई : "मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही."

Sharad Pawar, मुंबई : "मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. 

तेव्हा यशवंत चव्हाण  यांनी सभागृहाची माफी मागितली होती

शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे. ही संसद अशी आहे की सुंसावाद साधण्याची संधी मिळत असते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री होते. त्यांची पार्श्वभूमी तुमच्यासारखी अत्यंत सामान्य होती. कराडला त्यांची आई असायची. ते घरी गेले तेव्हा आईने विचारले तहसीलदार झाला का? एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी होतो त्यावेळी एसएम जोशी काही प्रश्न विचारत होते. त्यांना एक मंत्री उत्तर देत होते ते उत्तर एसएम जोशी यांना पटत नव्हतं. त्यांना तीन वेळा उत्तर दिल्यानंतर त्या मंत्र्यांनी अध्यक्षांनी सांगितले मी तीन वेळा उत्तर दिले यांच्या डोक्यात जात नाही. तेव्हा यशवंत चव्हाण  यांनी सभागृहाची माफी मागितली आणि म्हटले ह्या सभागृहात असे बोलता कामा नये.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या लोकांना एक व्यासपीठ मिळायला हवे अशी त्यांची भावना होती. त्यामुळं राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषद सुरू केले. आमचा प्रयत्न हाच आहे सरकार कोणाचे असो पण राष्ट्रभाषा टिकायला हवी. लोकांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचायला हवे. फुले यांनी जो विचार मांडला त्याचा प्रचार कसा होईल ह्याचा विचार व्हायला हवा. महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारात आधुनिकता होती. त्यांनी महिलांचे शिक्षण हा आधुनिकतेचा विचार केला त्यात सावित्री बाईंचे योगदान विसरता काम नये. मी नेहमी सांगतो हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा आहे.

ह्या देशात कामगारांचे कायदे नव्हते ते कायद्याचे मुद्दे स्वातंत्र्याआधी बाबासाहेबांनी उपस्थित केले

संविधान यांच्या निर्मिती मध्ये डॉ आंबेडकरांचे योगदान आहे. मी 10 वर्ष मंत्री कृषी मंत्री होतो. शेतीचा दुसरा प्रश्न वीज, पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा. ह्या देशाचं सर्वात मोठं धरण पंजाब हरियाणामध्ये आहे. ह्या धरणाचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. ते तिथेच थांबले नाही धरणाच्या पाण्याने वीज कशी करता येईल ह्याचा विचार केला. ह्या एवढ्या विजेला एका भागातून दुसऱ्या भागात कसे न्यायचे ह्यासाथी महामंडळ केले. बाबासाहेबांचं आधुनिकतेचं विचार होता. ह्या देशात कामगारांचे कायदे नव्हते ते कायद्याचे मुद्दे स्वातंत्र्याआधी बाबासाहेबांनी उपस्थित केले.  अश्याच कामात जबाबदारीने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून तुम्ही करत आहात. त्यामागे चव्हाण सेंटर तुमच्या मागे उभे आहे. मांडलेलं प्रश्न ह्याची नोट माझ्यासामोर आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत त्यांना चांगली मिळायला हवी, असंही शरद पवारांनी सांगितलं.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ramraje Naik Nimbalkar : तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत आहे, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget