Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
जात नाही ती जात अशी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे. मात्र फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या राज्यामध्ये हे घडू नये अशी अपेक्षा करणं काही गैर नाही. पण ज्या वयामध्ये एकतेचे संस्कार द्यायचे तेव्हाच जर कोणी जातीपातींच विष कालवत असेल तर ही घटना घडली आहे यवतमाळ मध्ये पण सगळ्यांनीच याची दखल घ्यावी अशी ही घटना आहे. नेमक काय घडलय बघूयात. खालीलपैकी उच्च जात कोणती? असा प्रश्न विचारून तुम्हाला चार पर्याय दिले तर? अनेकांना या प्रश्नाने निश्चितच धक्का बसेल. कारण जात विचारणं हा निदान आधुनिक महाराष्ट्रात तरी सुसंस्कृतपणा मानला जात नाही. मात्र चक्क एका परीक्षेतच शालेय विद्यार्थ्यांना नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आणि अनेकांना धक्का बसला. यवतमाळ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकरता मोहीम राबवली जाते. टारगेट. ही संस्था सुमारे 24 हजार विद्यार्थ्यांकडून सराव करून घेते. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एका सराव चाचणीत यापैकी उच्च जात कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. आणि त्याखाली पर्याय म्हणून चक्क आता कालबाह्य झालेल्या चार वर्णांची नाव देण्यात आली. या प्रकारामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून संतापाची भावना व्यक्त होती. ही गोष्ट सहजासहजी आलेली नाही. जातीयता, धर्मांदता आणि धर्मवाद निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक जे प्रयत्न होत आहे. या प्रयत्नाचा फलित म्हणून हे कालचे प्रश्नोत्तर आलेले आहे. कधी संबोधत पण नाहीये, त्याच्यामुळे जाणीवपूर्वक बाल मनावरती अशा प्रकारे बिंबवण्याच काम काही प्रवर्ती करतात का? याचा शोधा शोध मला वाटत या माध्यमातून घ्यावा लागेल, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सकोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणाने आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये करतोय. तर यावर संबंधित संस्थेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ मंदार पतकी यांनी दिली आहे. एकतेची भावना निर्माण करणे, उच्च नीच, गरीब श्रीमंत अशी दरी पडू नये म्हणून सगळ्याच शाळा गणवेशाच तत्व पाळतात. यवतमाळमध्ये घडलेली घटना यालाच छेद देणारी आणि म्हणूनच गंभीरही आहे. उच्च जात कोणती हा प्रश्न कोणाला पडला आणि तो विद्यार्थ्यांना विचारावा असं कोणाला वाटलं याचा शोध घेतला जाणं आणि त्याच्यावर कडक कारवाई करणं आवश्यक आहे. तसं झालं तरच यापुढे असले प्रश्न विचारण्याची हिम्मत कोणी करणार नाही. निलेश फाळके, एबीपी माझा यवतमाळ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट'.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























