एक्स्प्लोर

...तर राम मंदीर झालंच नसतं, 'बिनशर्त' पाठिंब्यावर बोलताना राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्यामागचं नेमकं कारण आज पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिरावरही भाष्य केलं.

मुंबई : सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) म्हणजेच मनसेने भाजपला (BJP) बिनशर्त बाठिंबा दिला आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेत या निर्णयाची जाहीरपणे घोषणा केली होती. राज यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर महायुतीने (Mahayuti) राज यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, राज यांच्या या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्यांनी आज (13 एप्रिल) पत्रकार परिषदेत भाजपला पाठिंबा देण्यामागचं नेमकं कारण सागंतिलं आहे. यावेळी बोलताना मोदी नसते तर अयोध्येतील राम मंदीर (Ayodhya Ram Temple) झालंच नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले?

मी याआधी भाजपवर टीका केली. त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवर मी टीका केली. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत काही गोष्टी चांगल्या झाल्या. त्या चांगल्या कामांचं मी स्वागत केलं. त्यांनी कलम 370 रद्द केलं. भाजपच्या काळातच राम मंदीर झालं. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. परंतु 1992 पासून ते 2024 सालापर्यंत राम मंदिराचं काम रखडलं होतं. या मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे. शरयू नदीमध्ये कारसेवकांची टाकून दिलेली प्रेतं, कारसेवकांना घालण्यात आलेल्या गोळ्या हे सगळं तेव्हा माध्यमांवर दाखवलं जायचं. राम मंदिर उभं राहिल्यानंतर या सर्व कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील, असे राज ठाकरे म्हणाले.

मोदी नसते तर राम मंदिराचा विषय...

 पुढे बोलताना मोदी नसते तर अयोध्येत राम मंदीर झालं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले. राम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. सध्या अनेक विषय प्रलंबित आहेत. मोदी नसते तर राम मंदिराचा विषयही असाच प्रलंबित राहिला असता. भाजपच्या सरकारने एनआरसी, कलम 370 याबाबत काही निर्णय घेतले. अशा अनेक गोष्टींचे मी स्वागत गेले. मी स्वत: फोन करून त्यांचे अभिनंदन केलेलं आहे. मोदी यांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं, अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.

दरम्यान, महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत. या मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवूच. यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, गड किल्ल्यांचं सवर्धन असे काही विषय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला असून त्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधावा, याची यादी आम्ही त्यांना पाठवणार आहोत, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.

 हेही वाचा : 

आशियातील 'या' पाच कुटंबांकडे आहे गडगंज पैसा, सर्वांधिक श्रीमंतांमध्ये अंबानी परिवाराचा नंबर कितवा?

Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget