एक्स्प्लोर

Mahayuti Govt: महायुती सरकारमधील राज्यमंत्र्यांची खदखद अखेर बाहेर पडलीच, पाच महिने होऊनही अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांकडे घेतली धाव

Mahayuti Govt: महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी झाला होता. त्यानंतर पाच महिने उलटूनही अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप झालेले नाही.

Mahayuti Govt: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला (Mahayuti Government) सत्तेत येऊन पाच महिने झाले आहेत. मात्र, अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या टेबलवर एकही फाईल येत नाही. परिणामी, राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात काही राज्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी झाला होता. त्यानंतर पाच महिने उलटूनही अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप झालेले नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील बहुतांश राज्यमंत्री अजूनही कोणत्याही अधिकारांशिवाय कार्यरत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही, तसेच त्यांच्या टेबलवर एकही फाईल पोहोचत नाही. या स्थितीमुळे राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचा सूर वाढला आहे. त्यांनी या संदर्भात अनेकवेळा तक्रार केली असली तरी अद्याप काहीही परिणाम झालेला नाही.

राज्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना दोनदा पत्र 

या पार्श्वभूमीवर काही राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांविरोधात दोनवेळा तक्रारीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची तक्रार राज्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी अधिकार वाटपासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्यानंतरही संबंधित कॅबिनेट मंत्र्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचेही समजते.

2014 सालच्या तुलनेत अतिशय कमी अधिकार 

सध्या राज्यात भाजपकडून मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक आणि शिवसेनेचे योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना तक्रार अर्ज देताना 2014 साली राज्यमंत्र्यांना काय अधिकार होते आणि आता काय दिले आहेत? याची देखील माहिती जोडण्यात आली आहे. 2014 सालच्या तुलनेत यंदा अतिशय कमी अधिकार देण्यात आल्याने राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महायुती सरकारमध्ये अस्वस्थता पसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

पावसाळी अधिवेशानापूर्वी तिढा सुटणार? 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे सोपवले आहेत. मात्र, इतर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या खात्यांमधील अधिकार राज्यमंत्र्यांना दिलेले नाहीत. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर नागपूर आणि अर्थसंकल्पीय अशी दोन अधिवेशने पार पडली, तरीही राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा प्रश्न कायम आहे. आता लवकरच पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून, त्यापूर्वी हा तिढा सुटतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा 

Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का, निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget