एक्स्प्लोर

मूळ प्रश्नापासून दूर जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हिंसाचाराच्या घटना घडवल्या जातायत; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 

Ambadas Danve On BJP  Government: अकोला आणि अहमदनगरच्या शेवगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत आहे. तर यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यातील हिंसाचाराच्या घटनेला राज्य सरकारला दोषी ठरवत टीका केली आहे. राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना घडवण्यामागे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्याचं तर हात नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही भाजपचे लोकं म्हणाले होते की, छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर कुठेच काहीही झालं नाही. मग अकोल्यात काय झालं, गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला आहे. याचा तपास केला पाहिजे, हिंसाचाराच्या घटनेचा तपास केला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक हिंसाचाराच्या घटना घडवण्याचे पाप आत्ताचं सरकार करत आहे. संभाजीनगरच्या घटनेनंतर देखील राज्याच्या गृह विभागाला अजूनही शहाणपण सुचलेलं नसल्याच दानवे म्हणाले आहे. 

 भाजपची सत्ता असताना राज्यात हिंसाचाराच्या घटना

जे काही संभाजीनगर जिल्ह्यात घडलं तेच अकोल्यात घडलं आहे. संभाजीनगरप्रमाणे अकोल्यात देखील पोलीस घटनास्थळी दीड-दोन तास उशिरा पोहचली. बेसावध जमावावर हल्ला करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. शेगावला देखील काय झाले याचा तपास केला पाहिजे. जाणीवपूर्वक सत्तधारी पक्ष हे सर्वकाही घडवत आहे. काही दिवसांपूर्वी बिहार आणि इतर भागात असेच काही घडलं आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आली नाही तर देशात हिंसाचारच्या घटना घडतील. भाजपची सत्ता असताना राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे आता लोकांनी समजून घेतलं पाहिजे. 

येणाऱ्या काळात देखील हिंसाचाराच्या घटना घडतील...

मुद्दाम समाजात फुट पाडणे, जातीमध्ये फुट पाडणे सुरु आहे. कारण सरकार जनतेच्या प्रश्नावर विरोधकांना, जनतेला उत्तर देऊ शकत नाही. जनतेच्या प्रश्नाला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे अशावेळी मूळ प्रश्नापासून दूर जाण्यासाठी हिंसाचार घडवला जात आहे. तसेच येणाऱ्या काळात देखील अशा घटना सरकराकडून घडवण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chandrakant Khaire : राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget