Devendra Fadanvis : शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत: देवेंद्र फडणवीस
Majha Vision Majha Maharashtra : विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे मित्रपक्षांना विश्वासात घेऊन भाजपची संसदीय मंडळ ठरवेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
![Devendra Fadanvis : शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत: देवेंद्र फडणवीस devendra fadanvis exclusive on sharad pawar eknath shinde congress maharashtra politics abp majha vision majha maharashtra Devendra Fadanvis : शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत: देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/14/544956199f5aabfe1e895c54241cfa531715675673155124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण
देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."
मराठी मतदार भाजपच्या पाठीमागे
मुंबईच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईचा विचार केला तर उद्धव ठाकरेंना लक्षात आलं आहे की, मराठी मतं ही पूर्वीसारखी त्यांच्याकडे राहिली नाहीत. आम्ही वेगळं लढलो तर भाजपच्या जागा जास्त आल्याचं दिसलं. त्यामध्ये मराठी मतदार हे भाजपच्या मागे असून मोदीजींच्या नावाखाली ते भाजपला मतदान करतात. ते भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांसाठी पायघड्या घातल्या. त्यामुळे काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिमधार्जिनी भूमिकी ठाकरेंनी घेतली."
आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असून या सरकारचं नेतृत्व हे मुख्यमत्री हेच आहेत. आपण आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून अधिकार घेतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये आपल्याबद्दल विश्वास
राज्यातील अनेक नेत्यांमध्ये असलेले मतभेद हे सागर बंगल्यावर सोडवली गेली, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात माझा सर्वच पक्षातील नेत्यांशी संपर्क आहे. आपण कुणालाही फसवणार नाही असा त्यांना विश्वास आहे. त्याचमुळे माझ्या कुवतीप्रमाणे सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमधून मार्ग काढतो.
अजितदादांना ज्यावेळी लक्षात आलं की शरद पवारांच्या सोबत राहिल्याने अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही, त्याचवेळी अजित पवारांनी ही भूमिका घेतली.
भारतीय जनता पक्षाने अनेक राज्याच्या निवडणुकीत एक सूत्र पाळलं, त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना विश्वासात घेऊन संसदीय समिती यावर निर्णय घेईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)