एक्स्प्लोर

Lok Sabha Election: भाजपचा 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्याचा प्लॅन फसला, गोपनीय सर्व्हेत मोदी सरकारला फक्त 150 जागा: भास्कर जाधव

Ratnagiri News: लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला फक्त 150 जागांवर विजय मिळेल, अशी माहिती गोपनीय सर्व्हेंमधून समोर आल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. पाच टप्प्यांमध्ये लांबलेले मतदान भाजपच्या विरोधात गेले.

रत्नागिरी: महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्याची भाजपची रणनीती फसली. याबाबत भाजपचं गणित पूर्णपणे चुकलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) फक्त 150 जागांवर विजय मिळेल, असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. ते सोमवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यात मतदान झालेले पाहिले नाही. महाराष्ट्रातूनच केंद्रातील सरकार हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी पाच टप्प्यात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. माझ्या अनुभवानुसार, पाच टप्प्यांमध्ये लांबलेले मतदान भाजपच्या विरोधात गेले. निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर भाजपने 400 पारची भाषा बंद केली. त्यानंतर भाजपची भाषणाची आणि प्रचाराची पातळी खालावत गेली. भाजपचा प्रचार भरकटत गेला. ते विषयाला धरुन बोलले नाहीत. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता दुखावली गेली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशाप्रकारची भाषण वापरणे कोणालाही अपेक्षित नव्हते. भाजपला पाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा फायदा होईल, असे वाटले होते. पण भाजपचं हे गणित फसले, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 1 जूनला एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होतील. पण त्यापूर्वीच काही गोपनीय सर्व्हे करण्यात आले आहेत. या गोपनीय सर्वेक्षणांचा कल पाहता मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत 150 जागांचा आकडाही पार करणार नाही. तर इंडिया आघाडी लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान

महाराष्ट्रात मंगळवारी पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण आणि पालघरमध्ये मतदान पार पडत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी पाहता मुंबईत मतदानाचा फारसा उत्साह दिसून येत नाही. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी 24.46 टक्के मतदान झाले. तर कांदा उत्पादकांचा परिसर असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33.25 टक्के मतदान झाले. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु असेल. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी काय असणार, यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. 

आणखी वाचा

 LIVE: राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 27.78 टक्के मतदान, दिंडोरीत मतदानाचा सर्वाधिक टक्का; दक्षिण मुंबईत मतदारांचा निरुत्साह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget