![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pritam Munde: बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळेच, प्रितम यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर
बीड (Beed) जिल्ह्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच बीड बिहार (Bihar) झालाय, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती.
![Pritam Munde: बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळेच, प्रितम यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर Beed's notoriety is due to your denial Pritam Munde dhananjay munde Pritam Munde: बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळेच, प्रितम यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/2565ec775ef72f25eeb8bb585b69a068_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pritam Munde: बीड (Beed) जिल्ह्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच बीड बिहार (Bihar) झालाय, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. यावरच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हात जोडून विनंती करतो पण जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती जाहीर व्यासपीठावरून केली होती. आता यालाच प्रत्यूत्तर बीड जिह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी दिले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे, ती तुमच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे.''
काय म्हणाल्या प्रीतम मुंडे
प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत की, ''बीड जिल्ह्याची सुरक्षा आणि भविष्याविषयीची चिंता हा पंकजा मुंडे यांचा धर्म आहे. यासाठीच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. पण आज बीडची जी बदनामी होत आहे. ती केवळ तुमच्या (धनंजय मुंडे) नाकर्तेपणामुळे होत आहे.'' त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पंकजाताई मुंडे यांनी मांडले. यात चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला नाही, तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत या विषयावर आक्रमक लक्षवेधी मांडली. तरीही तुमचे डोळे उघडत नाहीत. जनतेला तुम्ही गृहीत धरत आहात का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित धनंजय मुंडे यांना केला आहे.
पंकजा मुंडे या तत्त्वाचा राजकारणी - प्रीतम मुंडे
प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, पंकजा या 7 तारखेला रुग्णालयात अॅडमिट होत्या. त्याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया झाली. त्यांची प्रकृती खराब आहे. पंकजा यांना पातळी सोडून राजकारण करता येत असते, तर त्या खूप बोलल्या असत्या. पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. तुमचे आमदार लक्षवेधी आधी देतात. गावातील कार्यालयापासून ते तुमच्या कॅबिनपर्यंत माफिया राज आहे. हे जगजाहीर आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या ज्या काही घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, ते तुमच्या कारभाराचे अपयश आहे. त्यावर चिंतन करायचे सोडून उलट पंकजा यांच्यावर टिका करणे हे शोभते का? स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्यावर फोडण्याची तुमची नेहमीचीच सवय आहे, असे देखील प्रितम मुंडे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे
बीड बिहार झालाय पंकजा मुंडे यांच्या विधानावर बीडचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते की, ''दोन राजकीय पक्षांमध्ये दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या. तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय, तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करू नका. हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमीला बदनाम करु नका.'' बीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडेबीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे असे म्हणाले होते.
संबंधित बातमी:
Dhananjay Munde : पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचं राजकारण थांबवावं : धनंजय मुंडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)