Dattatray Bharne : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबतीत कोणाचही दुमत नाही, पण....; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे स्पष्टच बोलले
Dattatreya Bharane : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबतीत कोणाचही दुमत नाही. परंतु ते आरक्षण टिकलं पाहिजे. अशी भूमिका कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Dattatreya Bharane on Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शासनाने राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती यासाठी नेमली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, आम्ही सगळेजण सहमत आहोत. मात्र ते आरक्षण देतांना ते आरक्षण टिकलं पाहिजे. मनोज जरांगे यांचे पदाधिकारी आणि समिती यांच्यात लवकरच वाटाघाटी सुरू होईल. आणि योग्य तो निर्णय होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबतीत कोणाचही दुमत नाही. परंतु ते आरक्षण टिकलं पाहिजे. अशी भूमिका कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना व्यक्त केली आहे. ते इंदापूर येथे बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो विषय आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे याबाबतीत लक्ष आहे. विखे पाटील याबाबतीत निश्चित प्रकारे लक्ष घालतील आणि लवकरच योग्य तो निर्णय होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार निश्चित प्रकारे लवकरात लवकर मार्ग काढतील आणि योग्य तो निर्णय होईल. शिवाय मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठेही वाद होणार नाही. किंबहुना वाद कोणी लावू नये म्हणजे वाद होणार नाही. असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान; शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासन उभं
नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. या राज्यामध्ये निम्म म्हटलं तरी 30 ते 40 टक्के नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. याबाबतीत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासन उभं आहे. प्रशासनाला सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार उभे राहणार आणि योग्य ती मदत सरकारच्या वतीने केली जाईल. असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























