एक्स्प्लोर

Anjaneri-Brahmagiri Ropeway : अंजनेरी ते ब्रह्मगिरी अशी पाच किलोमीटरची हवाई सफर, रोपवेसाठी महिनाभरात निघणार निविदा

Anjaneri-Brahmagiri Ropeway : बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

Nashik News : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला (Anjaneri-Brahmagiri Ropeway) किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्याचबरोबर येत्या तीन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षभर हजारो लाखो भाविकांचा राबता या त्र्यंबक नगरीत असतो. त्याचबरोबर जवळच असलेल्या अंजनेरी येथेही भाविकांची गर्दी असते. हे दोन्ही पर्यटनस्थळ भाविकांना हवाई सफरीचा माध्यमातून पाहता यावेत यासाठी अंजनेरी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र स्थानिक गावकरी आणि पर्यावरणप्रेमींचा देखील विरोध होता. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र नव्याने या प्रकल्पाला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वर शहराजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना दोन पर्वतांना जोडणाऱ्या रोपवेला मंजुरी मिळाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे या दोन्हीही तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा तसेच खा. हेमंत गोडसे यांचा विश्वास आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ही केंद्र सरकारची कंपनी हे काम 2 वर्षात करणार असून 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 
 
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी (5.8 किलोमीटर) अंतर रोपवेने जोडले जाणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत हे पर्वत एकप्रकारे हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. कठीण डोंगराळ भागात पारंपारिक रस्त्यांच्या जागी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा स्वरुपाचे रोपवे उभारण्याचे मानस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात करत पर्वतमाला योजना घोषणा केली होती. एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांच्यासह प्रतिनिधी यापूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली आहे. तर नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींना सहकार्य आणि योग्य ती मदत करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्र्यंबक तहसीलदारांना दिले आहेत.

असा असेल रोपवे!

ब्रह्मगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यान या रोपवे प्रकल्पाचे अंतिम संरेखन राज्य सरकारशी सल्लामसलत करुन निश्चित झाले आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी 30 हून अधिक टॉवर बांधले जातील. रोपवेची वाहून नेण्याची क्षमता प्रति तास किमान 1500 प्रवासी शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रोपवे स्टेशन उभारले जाऊ शकते.

भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त

ब्रह्मगिरी पर्वत आणि अंजनेरी या दोन्ही डोंगरांना धार्मिक महत्त्व आहे. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तिच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आहे. तसेच अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येतात. रोपवेमुळे दोन्ही डोंगरमाथ्यावर पर्यटकांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.

निसर्गप्रेमींची नाराजी कायम

दरम्यान या प्रकल्प बाबत निसर्गप्रेमींनी निसर्ग पर्यावरण धोक्यात येईल, असे सांगत यापूर्वीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत होऊ घातलेला हा प्रकल्प स्थानिक पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र आता निविदा निघाल्यानंतर पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकताच ब्रह्मगिरी येथील डोंगरावर दगड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आगामी काळात जर रोपवे झाला तर या सर्व बाबी प्रशासनाने तपासून घेणे महत्वाचे असणार आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Flood: नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Embed widget