एक्स्प्लोर

Anjaneri-Brahmagiri Ropeway : अंजनेरी ते ब्रह्मगिरी अशी पाच किलोमीटरची हवाई सफर, रोपवेसाठी महिनाभरात निघणार निविदा

Anjaneri-Brahmagiri Ropeway : बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

Nashik News : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला (Anjaneri-Brahmagiri Ropeway) किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्याचबरोबर येत्या तीन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षभर हजारो लाखो भाविकांचा राबता या त्र्यंबक नगरीत असतो. त्याचबरोबर जवळच असलेल्या अंजनेरी येथेही भाविकांची गर्दी असते. हे दोन्ही पर्यटनस्थळ भाविकांना हवाई सफरीचा माध्यमातून पाहता यावेत यासाठी अंजनेरी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र स्थानिक गावकरी आणि पर्यावरणप्रेमींचा देखील विरोध होता. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र नव्याने या प्रकल्पाला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वर शहराजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना दोन पर्वतांना जोडणाऱ्या रोपवेला मंजुरी मिळाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे या दोन्हीही तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा तसेच खा. हेमंत गोडसे यांचा विश्वास आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ही केंद्र सरकारची कंपनी हे काम 2 वर्षात करणार असून 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 
 
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी (5.8 किलोमीटर) अंतर रोपवेने जोडले जाणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत हे पर्वत एकप्रकारे हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. कठीण डोंगराळ भागात पारंपारिक रस्त्यांच्या जागी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा स्वरुपाचे रोपवे उभारण्याचे मानस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात करत पर्वतमाला योजना घोषणा केली होती. एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांच्यासह प्रतिनिधी यापूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली आहे. तर नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींना सहकार्य आणि योग्य ती मदत करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्र्यंबक तहसीलदारांना दिले आहेत.

असा असेल रोपवे!

ब्रह्मगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यान या रोपवे प्रकल्पाचे अंतिम संरेखन राज्य सरकारशी सल्लामसलत करुन निश्चित झाले आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी 30 हून अधिक टॉवर बांधले जातील. रोपवेची वाहून नेण्याची क्षमता प्रति तास किमान 1500 प्रवासी शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रोपवे स्टेशन उभारले जाऊ शकते.

भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त

ब्रह्मगिरी पर्वत आणि अंजनेरी या दोन्ही डोंगरांना धार्मिक महत्त्व आहे. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तिच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आहे. तसेच अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येतात. रोपवेमुळे दोन्ही डोंगरमाथ्यावर पर्यटकांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.

निसर्गप्रेमींची नाराजी कायम

दरम्यान या प्रकल्प बाबत निसर्गप्रेमींनी निसर्ग पर्यावरण धोक्यात येईल, असे सांगत यापूर्वीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत होऊ घातलेला हा प्रकल्प स्थानिक पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र आता निविदा निघाल्यानंतर पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकताच ब्रह्मगिरी येथील डोंगरावर दगड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आगामी काळात जर रोपवे झाला तर या सर्व बाबी प्रशासनाने तपासून घेणे महत्वाचे असणार आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget