एक्स्प्लोर

Anjaneri-Brahmagiri Ropeway : अंजनेरी ते ब्रह्मगिरी अशी पाच किलोमीटरची हवाई सफर, रोपवेसाठी महिनाभरात निघणार निविदा

Anjaneri-Brahmagiri Ropeway : बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

Nashik News : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला (Anjaneri-Brahmagiri Ropeway) किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्याचबरोबर येत्या तीन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षभर हजारो लाखो भाविकांचा राबता या त्र्यंबक नगरीत असतो. त्याचबरोबर जवळच असलेल्या अंजनेरी येथेही भाविकांची गर्दी असते. हे दोन्ही पर्यटनस्थळ भाविकांना हवाई सफरीचा माध्यमातून पाहता यावेत यासाठी अंजनेरी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र स्थानिक गावकरी आणि पर्यावरणप्रेमींचा देखील विरोध होता. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र नव्याने या प्रकल्पाला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वर शहराजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना दोन पर्वतांना जोडणाऱ्या रोपवेला मंजुरी मिळाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे या दोन्हीही तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा तसेच खा. हेमंत गोडसे यांचा विश्वास आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ही केंद्र सरकारची कंपनी हे काम 2 वर्षात करणार असून 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 
 
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी (5.8 किलोमीटर) अंतर रोपवेने जोडले जाणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत हे पर्वत एकप्रकारे हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. कठीण डोंगराळ भागात पारंपारिक रस्त्यांच्या जागी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा स्वरुपाचे रोपवे उभारण्याचे मानस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात करत पर्वतमाला योजना घोषणा केली होती. एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांच्यासह प्रतिनिधी यापूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली आहे. तर नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींना सहकार्य आणि योग्य ती मदत करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्र्यंबक तहसीलदारांना दिले आहेत.

असा असेल रोपवे!

ब्रह्मगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यान या रोपवे प्रकल्पाचे अंतिम संरेखन राज्य सरकारशी सल्लामसलत करुन निश्चित झाले आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी 30 हून अधिक टॉवर बांधले जातील. रोपवेची वाहून नेण्याची क्षमता प्रति तास किमान 1500 प्रवासी शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रोपवे स्टेशन उभारले जाऊ शकते.

भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त

ब्रह्मगिरी पर्वत आणि अंजनेरी या दोन्ही डोंगरांना धार्मिक महत्त्व आहे. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तिच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आहे. तसेच अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येतात. रोपवेमुळे दोन्ही डोंगरमाथ्यावर पर्यटकांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.

निसर्गप्रेमींची नाराजी कायम

दरम्यान या प्रकल्प बाबत निसर्गप्रेमींनी निसर्ग पर्यावरण धोक्यात येईल, असे सांगत यापूर्वीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत होऊ घातलेला हा प्रकल्प स्थानिक पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र आता निविदा निघाल्यानंतर पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकताच ब्रह्मगिरी येथील डोंगरावर दगड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आगामी काळात जर रोपवे झाला तर या सर्व बाबी प्रशासनाने तपासून घेणे महत्वाचे असणार आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Embed widget