एक्स्प्लोर

Nashik AC Poultry Farm : नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, शेतात उभारला वातानुकुलित 'पोल्ट्री फार्म'

Nashik AC Poultry Farm : शेतीला जोडधंदा असावा म्हणून शेतकरी वर्ग पोल्ट्री फार्म व्यवसायाकडे वळला आहे.

Nashik AC Poultry Farm : गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावात होणारा चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय सध्या 'धोक्यात' येवू लागला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असावा म्हणून शेतकरी वर्ग पोल्ट्री फार्म या व्यवसायाकडे वळला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात अत्याधुनिक व वातानुकुलित पोल्ट्री फार्म (Poultry Farm) उभारला असून महिन्याकाठी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळवू लागला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीपिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. शेतात राबून उत्पादन तयार करायचं. हाती उत्पादन यायची वेळ आली की, निसर्गाने ते हिरावून न्यायचं... अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यावर मात करण्यासाठी जोडधंदा म्हणून अनेक आव्हानांना तोंड देत पोल्ट्री व्यवसायात शेतकऱ्यांनी आपला पाया भक्कम केला आहे. मात्र अनेकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना देखील बसत आहे. कधी वातावरणानुसार पक्षांची  वाढ होत नाही तर कधी रोगाचा प्रादुर्भाव होवून अनेक पक्षी दगावले जातात. यावर उपाय म्हणून नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक व वातानुकुलित असा पोल्ट्री फार्म उभारलाय.

तसेच, साधारण पोल्ट्री फार्मपेक्षा वातानुकुलित पोल्ट्री फार्म उभारल्याने शेतकऱ्याचे अनेक फायदे होतात. पोल्ट्री फार्म उभारल्यानंतर पक्षांना खाद्याची आवश्यकता असते. मात्र वातानुकूलित पुलंतरी फार्म उभारल्यास खाद्याची नासाडी थांबते, खाद्य टाकण्यासाठी एका माणसाचा वेळ वाचतो. शेडमध्ये दीडपट अधिक पक्षी ठेवणे शक्य होते. उन्हाळ्यात होणारी पक्ष्यांची मरतूक, व्हायरल इन्फेक्शन चे धोके कमी होतात. वातानुकूलित पोल्ट्रीमुळे उग्रवासाच्या त्रासापासून परिसरात सर्वांना सुटका मिळते.स्वयंचलित यंत्रणेमुळे पाणी सांडत नसल्याने शेड कोरडे राहत असल्याने माशाही येत नाहीत. परिणामी पक्ष्यांची वाढ होण्याचा कालावधी संरक्षित वातावरणामुळे सुमारे 8 ते 10 दिवसांनी कमी होवून 42 ते 45 व्या दिवशी मिळणारे आवश्‍यक वजन 35 व्या दिवशीच मिळते. त्यामुळे 35 दिवसांची एक बॅच  गेली की एक ते सव्वा लाख रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी हमखास दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते.

दरम्यान साधारण दहा हजार पक्षांचा वातानुकूलित पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सुमारे 60 ते 70 लाख रुपये एवढा खर्च येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याजवळ भांडवल उपलब्ध होत नाही. म्हणून वातानुकूलित पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी शासनाने कर्ज किंवा अनुदान रुपी मदत केल्यास निश्चितच पोल्ट्री व्यवसाय एक अग्रगण्य व्यवसाय म्हणून ओळखला जाईल आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी हक्काचं उत्पन्नाचे साधन बनेलं, अशी प्रतिक्रिया पोल्ट्री व्यावसायिक संदीप सोनवणे यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget