एक्स्प्लोर

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, फळबागांसह रब्बी पिकांना मोठा फटका

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rains) हजेरी लावत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे.

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rains) हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तर नंदुरबारमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अन्य जिल्ह्यातही द्राक्ष, आंबा, संत्रा, रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. 

राज्यातील नाशिक, नंदुरबार, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसानं भर घातल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत.  

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, शेती पिकांचं नुकसान

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या अवकाळी पावसामुळे कांदा, भाजीपाला, आंबा तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यातही अवकाळी 

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुदखेड इथल्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. मुदखेड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचलं असून रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मुदखेड शहरातील वाहतुकीचा खोळंबा झाला.

लातूर जिल्ह्यात जोरदार अवकाळी रब्बी पिकांचे नुकसान 

लातूर जिल्ह्यातील जळकोट शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जळकोट तालुका आणि परिसरामध्ये काही ठराविक कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाला आहे. या पावसामुळं आंब्याच्या बागेचं आणि भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे रब्बी ज्वारी, कांदा तसेच हळद पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांची हळद उघड्यावर आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कापसाचे भाव देखील कमी झाले आहेत, सोयाबीनही गडगडले आहे. सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget