एक्स्प्लोर

Nashik News : वानराच्या निधनानंतर गाव शोकसागरात, एकही चूलही पेटली नाही, मालेगावमध्ये अंत्ययात्रा 

Nashik News : वानराच्या निधनानंतर मालेगाव तालुक्यातील टेहरे टोकडे गावात अजून एकाही घरातील चूल पेटलेली नाही.

Nashik News : आपल्या गावातून एखादं माणूस गेलं तरी आपला जीव कासावीस होतो. घरातली कुणीतरी व्यक्ती गेली तर कुटुंबीयांसह आपल्या अश्रूंचा बांध फुटतो. तसंच काही वन्यप्राण्यांच्या बाबतीतही घडताना अनेकदा दिसून येत. असाच काहीसा प्रकार मालेगाव (Malegaon) तालुक्यात घडला आहे. एका वानराच्या निधनानंतर मालेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

वानराच्या माणुसकीच्या अनेक घटना आजवर ऐकल्या असतील. कुठे वानराने (Monkey Death) अंत्ययात्रेला हजेरी लावली. तर कुण्या माणसाकडून बाटलीने पाणी प्यायले. तर कुठे वानर एखाद्याचा घरात वास्तव्यास राहिले. मात्र एक वानर चक्क एकाच गावात दहा वर्ष राहिले आणि याच गावात त्याचे दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टेहरे टोकडे गावात ही घटना घडली आहे. तब्बल दहा वर्षाहून अधिक काळ या गावात वास्तव्य केलेल्या एका वानराच्या निधनानंतर आख्खं गाव शोकसागरात बुडाले आहे. 

दरम्यान वानराच्या निधनानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून टेहरे टोकडे गावात अजून एकाही घरातील चूल पेटलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून हे वानर या गावात राहत होते. त्यामुळे गावातील प्रत्येकाशी त्याचा लळा लागलेला होता. मात्र वानराच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावाने हंबरडा फोडला आहे. वानराच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याची गावातून अंत्ययात्रा देखील काढली, शिवाय पारंपारिक पद्धतीने त्याचा अंत्यविधी पार पडला. साधारण! 10 ते 11 वर्षांपूर्वी आईपासून दुरावलेलं हे वानर या गावात आलं. ग्रामस्थांनी त्याला मायेची उब दिली. ग्रामस्थांचं प्रेम पाहून वानर जंगल विसरून टेहरे टोकड्याचा झालं. मात्र अचानक त्याची तब्ब्येत बिघडली. जागचं न हालतं बिचारं पाच तास पडून होतं. त्याची अशी अवस्था पाहून ग्रामस्थांनी तातडीने पशू वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावले आणि तपासणी केल्यानंतर या वानराचं निधन झाल्याचं कळताच शोककळा पसरली. लाडक्या वानराला श्रद्धांजली देण्यासाठी गावात 11 दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. 

संपूर्ण गाव शोकसागरात .... 

आजही अनेकजण प्राण्याप्रति सहवेदना व्यक्त करतात. तर अनेकजण प्राणी देखील पाळून त्यांना जीव लावत असतात. गावाकडे गाय, बैल, बकरी यांसारखे प्राणी देखील पाळले जातात. लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांशी खूपच जवळीक असते. एखाद्या माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील आपल्या मालकाच्या भावना कळतात. जर घरातील प्राणी लांब गेलं किंवा जगातून निघून गेलं तर नक्कीच लोकांना दु:ख होतं. काही लोक तर आपल्या आवडत्या प्राण्यांच्या विरहानंतर त्याच्या आठवणीत रडत असल्याचं देखील तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हे सगळं एखाद्या कुटुंबापुरतं असतं किंवा त्या प्राण्याला सांभाळणाऱ्या मालकाला दु:ख होतं, पण एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका माकडाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावाला वाईट वाटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget