एक्स्प्लोर

Nashik Udayanraje Bhosle : महापुरुषांचे योगदान मोठं, विकृत माणसांनी बोध घ्यायला हवा : उदयनराजे भोसले 

Nashik Udayanraje Bhosle : समाजात विकृती वाढत असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Nashik Udayanraje Bhosle : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shiwaji Maharaj), संभाजी महाराज यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्यांनी जे विचार मांडले, त्यांची उंची सुद्धा आपण गाठू शकत नाही, मात्र आजच्या घडीला जातीं जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी व्यक्त केले. 

नाशिकमध्ये (Nashik) भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना समाजात वाढत असलेल्या विकृतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की समाजात अशा प्रकारची विकृती आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. त्यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

आजच्या भाजप कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत मान्यवरांनी जे मुद्दे मांडले ते सर्व लोकहिताचे असून सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग असेल, मग अपेक्षित वर्ग असेल या सर्वांना स्पर्श करणारे असे सगळे मुद्दे मांडयताले. भारतीय जनता पार्टीचे सर्व देश पातळीचे, राज्य पातळीचे नेते काम करत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. लोकांना आज पर्यंत दिलासा मिळाला नाही, या सर्वांचे प्रेरणेतून नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी बोलून दाखवली. 

उदयनराजे पुढे म्हणाले कि, सध्या विरोधक नुसते आरोप करत आहेत, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच त्यांचं काम असते. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार समाजात रूढ होत चालला आहे, पण आजचे लोक सुज्ञ असून लोक विचार करतात, हे राजकारण्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे द्यायला विसरले नाही.

समाजात विकृती वाढते आहे... 

महापुरुषांना कमी लेखण्याची विकृती समाजात आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget