एक्स्प्लोर

Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरी धमकी प्रकरणी एनआयएची हायकोर्टात धाव, खटला मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी 

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खंडणी मागणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाचा खटला मुंबईला स्थलांतरित केला जावा यासाठी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केलं आहे.

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे खंडणी मागणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाचा खटला मुंबईला स्थलांतरित केला जावा यासाठी एनआयएने (NIA) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) अपील दाखल केलं आहे. न्यायालयाने या अपिलावर सुनावणी करत राज्य सरकार आणि मुख्य आरोपी जयेश पुजारी यांना नोटीस बजावून यावर 30 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

एनआयएने 15 जुलै रोजी नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करुन इथला न्यायिक रेकॉर्ड मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी केली होती. तसंच नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डही मागितला. 18 जुलै रोजी विशेष सत्र न्यायालयाने न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी नामंजूर केली. त्याविरुद्ध एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करुन इथल्या खटल्याचा रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती एनआयएने हायकोर्टात केली आहे.

नागपूरच्या विशेष कोर्टाने काय म्हटलं होतं?

18 जुलै रोजी नागपूरच्या विशेष न्यायालयाने म्हटलं होतं की, गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल होते मग एनआयए मुंबईत तिसरा गुन्हा का नोंदवला अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) धंतोली पोलीस स्टेशनमध्ये यूएपीए कायद्याअंतर्गत आधीच गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी करावा. एनआयएला तपास करायचा असल्यास त्यांनी तपास करुन चार्जशीट नागपूरच्या न्यायालयात दाखल करावी, असंही न्यायालयाने म्हटलं. तरीही एनआयएला दोन्ही प्रकरणाचा तपास आपल्याकडे हवा असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा, असंही न्यायालयाने नमूद केलं.

नितीन गडकरी यांना धमकीचे कॉल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्च धमकीचे फोन आले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. बेळगाव तुरुंगातून धमकीचे फोन आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी उर्फ शाकीरला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते. नागपूर पोलिसांच्या चौकशीत जयेश पुजारीने सुरुवातीला दिशाभूल केली. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमध्ये धमकीच्या कॉल्सचे सूत्रधार वेगळेच असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी मग त्यांचा तपास त्या दिशेने सुरु झाला. 

गडकरींच्या कार्यालयात  21 मार्च रोजी दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. खंडणीसाठी कर्नाटकमधील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी त्या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या रिजवाना नावाच्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहिच्या आधारावर बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामगचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आलं.  

संबंधित बातमी

Nitin Gadkari Threat Call : गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही, नागपूर कोर्टाकडून याचिका निकाली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget