एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरात अवकाळी पावसाचं धुमशान; पहिल्याच पावसात कोट्यवधीच्या इमारतीची पोलखोल?

Maharashtra Nagpur News : नागपुरात अवकाळी पावसानं धुमशान घातलं असून या पहिल्याच पावसात नुकत्याच बांधलेल्या कोट्यवधींच्या इमारतीचं नुकसान झालं आहे.

Maharashtra Nagpur News : सध्या राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलं आहे. राज्यासह काल नागपुरातही अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. काल (मंगळवारी) नागपुरात झालेल्या पावसानं थैमान घातलं. अशातच कालच्या पावसात नागपुरात नुकतंच उद्घाटन झालेल्या इमारतीचं मोठं नुकसान झालं. ही इमारत म्हणजे, नुकतंच उद्घाटन झालेलं पोलीस भवन. 

काही दिवसांपूर्वीच नागपुरात पोलीस भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पण काल झालेल्या अवकाळी पावसानं पोलीस भवनातील फॉल सिलिंगच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी झालेला पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पोलीस भवनाच्या तिसर्‍या चौथ्या आणि सहाव्या माळ्यावर काही ठिकाणी फॉल सीलींग खाली पडलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झालेला नाही. 

नागपुरात काल (मंगळवारी) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये सिव्हिल लाईन परिसरातील पोलीस भवनात काही ठिकाणी फॉल सीलींग खाली पडलं. विशेष म्हणजे, 29 एप्रिल रोजीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस भवनाच्या इमारतीचा उद्घाटन झालं होतं. नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक या दोघांचं कार्यालयही याच इमारतीत आहे. तसेच नागपुरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं कार्यालयही याच इमारतीत आहे. 

दरम्यान, सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून पोलीस भवनाची ही भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली आहे. मात्र पहिल्याच पावसात याचं फॉल सीलींग खाली पडल्यामुळं इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. पोलीस भवनाच्या इमारतीचं बांधकाम मेहता कन्स्ट्रक्शन कंपनीनं केलं असून आजच्या घटनेसंदर्भात कंत्राटदाराला माहिती देण्यात आली आहे. परंतु, पावसाळा तोंडावर आहे आणि नव्यानं बांधलेल्या इमारतीच्या अशा अवस्थेमुळे सर्वसामान्यांकडूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha News | Harshwardhan Sapkal यांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद, अजितदादांनी चांगलंच सुनावलंABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 17 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget