एक्स्प्लोर
...आणि पतीने भाजी चिरण्याच्या चाकून पत्नीला संपवलं!
पत्नीच्या घरी बहिणीचे लग्न असल्याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात काही दिवसापासून वाद सुरु होता. याच रागातून बिरबलने काल रात्री तिचा घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने गळा चिरला.

भांडुप : भांडुपच्या तुलशेतपाडा भागात पतीने पत्नीची हत्या केली आणि चोराने पत्नीची हत्या केल्याचा बनाव रचल्याचे घटना घडली. मृत पत्नीचे नाव नेहा गुप्ता असून आरोपी पतीचे नाव बिरबल गुप्ता असे आहे.
नेहा आणि बिरबल यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गुप्ता दाम्पत्याला तीन लहान मुली आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडणे होत होती. पत्नीच्या घरी बहिणीचे लग्न असल्याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात काही दिवसापासून वाद सुरु होता. याच रागातून बिरबलने काल रात्री तिचा घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने गळा चिरला.
सकाळी घरात चोर शिरले आणि त्यांनी पत्नीची हत्या केल्याची ओरड बिरबले केली. परंतु भांडुप पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
