एक्स्प्लोर

महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटांमागे कोण? पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर म्हणतात..

महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटांमागे कोण? याचं उत्तर पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात दिलंय.

मुंबई : राज्यात आणि एकूणच देशात दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहेत. मात्र, या नैसर्गिक संकटांमागे मानवाचाच हात असल्याचे स्पष्ट मत पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात मांडले. जगभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला ओरबाडले जात आहे. हे आताच थांबले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. विकास करण्याला माझा विरोध नाही. मात्र, हा विकास पर्यावरणपूरक असवा असेही ते म्हणाले.

म्हणून निसर्गाचा समतोल ढासळतोय
पर्यावरणतज्ञ माधवराव गाडगीळ यांच्यासह अनेकांनी यापूर्वीच निसर्गाचा समतोल ढासळत असल्याबद्दल सरकारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच अशा घटना घडत आहेत. आपण आपला इतिहास पाहिला तर भारताच्या खूप मोठ्या क्षेत्रावर जंगल होतं. मात्र, सद्यस्थितीत देशात जंगलाचे क्षेत्र खूप कमी झाले आहे. वनविभागाचा अहवाल सांगतो की दरवर्षी एक ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील जंगल नष्ट होते. मात्र, गाडगीळकरांच्या मते दरवर्षी यापेक्षा जास्त जंगल नष्ट होत आहे.

पूरपरिस्थितीसाठी आपणच कारणीभूत
जेव्हा जंगलांमध्ये पाऊस पडतो. तेव्हा खूप कमी प्रमाणात मातीची धूप होते. मात्र, जंगल नष्ट केल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील माती धरण आणि समुद्रात वाहून जात आहे. परिणामी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जंगल हे एकाच वेळेला आपले पाऊस, प्रदूषण यांच्यापासून संरक्षण करते. सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यालाही कारण, मानवी हस्तक्षेपच आहे. मोठ मोठी धरणं, रस्ते, बांधकामं या ठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे या भागात नैसर्गीक आपत्ती वाढत असल्याचे मत देऊळगावकरांनी व्यक्त केले.

हवामान बदल..
ब्राझीलमध्ये असलेल्या अॅमेझोन जंगलाला पृथ्वीचे फुफ्फस म्हटले जाते. याच देशाच्या अध्यक्षांनी मागे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले. यामुळे अॅमेझोन जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येत आहे. जास्तीत जास्त जमीन शेती आणि उद्योगधंद्यासाठी मिळावी यासाठी अनेक देशांमध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहे. मागली काही वर्षात ब्राझीलमध्ये एक कोटी हेक्टरवरील जंगल नष्ट केलं आहे.

सह्याद्री पोखरला जातोय
सह्याद्री संदर्भात माधवराव गाडगीळ यांनी अहवाल दिला आहे. सह्याद्री पोखरणं सुरु आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात पश्चिम घाटत खाणी सुरु आहेत. अनेक ठिकाणी जंगलं तोडून बेकायदेशीर बांधकामे सुरु आहेत. आपण पाणथळ जागेवर बांधकामं करुन पाण्याची वाट अडवतो. त्यामुळे पाणी आपली वाट काढते आणि यामुळेच पूरपरिस्थिती निर्माण होते. पर्यावरण तज्ञ अनिल अग्रवाल यांनी यापूर्वीच सांगितलं आहे, की मोठ मोठी धरणं बांधण्यापेक्षा छोट छोटी धरणं बांधली पाहिजेत. कारण, अनेक ठिकाणी धरणांमुळेच दरवर्षी पूर येत असल्याचा अनुभव आहे. आपण आपले धरण व्यवस्थापन बदलण्याचाही विचार करणार आहे की नाही? असा प्रश्न देऊळगावकर यांनी उपस्थित केला.

नैसर्गिक भिंत उभारणे अधिक सोप्पं
सुनामी आल्यानंतर अनेक तज्ञांनी समुद्रकिनारी खारपुटी लावण्यावर भर दिला होता. हिच आपली संरक्षक भिंत आहे. मात्र, महाराष्ट्राचा विचार केला तर कितीतरी खारपुटी आणि कांदळवणं नष्ट केली जात असल्याचे देऊळगावकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget