एक्स्प्लोर

Mumbai Water Shortage: मुंबईवर पाणीकपातीचं संकट, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 26 टक्के पाणी शिल्लक

Mumbai Water Shortage: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धराणांमध्ये 26 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आता पाणी कपातीचं संकट घोंगावत आहे.

Mumbai Water Shortage: संपूर्ण मुंबईला(Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये(Dam) फक्त 26 टक्केच पाणीसाठा आता शिल्लक राहीला आहे. मागील वर्षी याच काळात हा पाणीसाठा 30 टक्के होता मात्र आता हा पाणीसाठा कमी झाल्याचं पहायला मिळतयं. तसेच यावर्षी कमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.याचसाठी मुंबईला अतिरिक्त साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली आहे.  त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट येणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईच्या आजूबाजूला जरी समुद्र असला तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणारे स्रोत तसे  ठरावीकच आहेत. मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा. परंतु या सातही धरणांमध्ये मिळून फक्त 26 टक्केच पाणीसाठा मुंबईकरांसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मुंबईकर सध्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे या दिवसांत पाणी कपात होणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्यचा प्रश्न देखील गंभीर होतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

मुंबई महानगरपालिकेने देखील राज्य सरकारला पत्र लिहून अतिरिक्त पाण्याचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली आहे. हे पत्र आता मंत्रालयात असून राज्य सरकार आता त्यावर योग्य निर्णय लवकरच घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. फक्त 26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईकरांसाठी आता पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा 30 टक्के होता त्यामुळे पाण्याच्या टंचाईची फारशी भिती नव्हती. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण देखील कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. 

हा पाणीसाठा येणाऱ्या काळात आणखी कमी झाला तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल असे देखील सांगण्यात येत आहे. आधीच मुंबईचा उकाडा त्यात कमी पावसाचा अंदाज आणि आता कमी पाणीसाठा त्यांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न येत्या पुढील काही काळात निर्माण होणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ajit Pawar on Raj Thackrey: काकांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget